शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
2
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
3
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
4
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
5
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
6
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
7
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
8
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतली विशेष काळजी; जवळच्या लोकांना भेटायला न येण्याचे केले आवाहन
9
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
10
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
11
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
12
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
13
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
14
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
15
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
16
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
17
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
18
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
19
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
20
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

काळेकुट्ट ढग आकाशी ; पण पाऊसच नाही

By admin | Published: August 20, 2016 12:24 AM

आकाशात काळेकुट्ट ढग दिवसरात्र गर्दी करीत आहेत. ढगांकडे टक लावून बघितल्यास मनात आस होते की, नक्कीच पाऊस पडेल.

दुष्काळाचे सावट : रोवणी पडली पिवळी, उत्पन्नावर परिणाम मुखरू बागडे पालांदूरआकाशात काळेकुट्ट ढग दिवसरात्र गर्दी करीत आहेत. ढगांकडे टक लावून बघितल्यास मनात आस होते की, नक्कीच पाऊस पडेल. पण मंद वाऱ्याच्या साथीने ढग पुढे पुढे सरकतात. मनातली आशा मनातच विरते. ५-१० थेंब जमिनीवर निसर्गराजा शिंपडतो. यालाच पावसाळा मानायचे काय, असा संतप्त प्रश्न बळीराजाच्या मुखातून निघत आहे. पावसाळ्याचे दिवस असतानाही निसर्ग कोपल्याने पावसाने दडी मारली आहे. यामुळे रोवणी पिवळी पडली आहे. तर जिथे रोवणी पूर्ण झाली त्या शेतात निंदन भरपूर झाले आहे. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. जून, जुलै महिना सुरू असतानाही अल्पसा पाऊस पडला. आॅगस्ट महिन्याचा मध्यान्ह निघून गेला. तरीपण पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. पालांदूर परिसरात जून महिन्यात ९३ मि.मी., जुलैमध्ये ४१८ मि.मी. तर आॅगस्ट मध्ये ६१.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. रोवणी झालेल्या धानाला पाणी नसल्याने निंदन भरघोष येत आहे. रोवणीला खर्च तीन हजार तर निंदनाला तीन हजाराच्या वर खर्च बळीराजाला येत आहे. मजूर मिळेनासे झाले आहे. पाऊसच नसल्याने किटकनाशक फवारणीकरीता बांध्यात पाणी नाही. शेतकरी पूर्णत: मेटाकुटीस आला असून मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरड्या दुष्काळाचे कालचक्राचे आर्थिक संकट यावर्षीही सहन करावे लागणार आहे. मागील वर्षी पालांदूर परिसरात आणेवारी ५० पैशाच्या आत असूनही बिमा मिळालेला नाही. प्रशासनाने केवळ भुलथापा दिले आहेत. बहुप्रतिक्षीत गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून वगळल्याने नुकसान आणखी वाढणार आहे. पावसाने दीर्घ उसंती घेतली तर दुष्काळाचे सावट नक्कीच आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असले तरी अनेक ठिकाणचे जलसाठे अत्यल्पच आहेत. यावरूनच पाणी समस्या दिवसागणिक डोके वर काढीत आहे. या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यास शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशा पल्लवीत होतील, अन्यथा कजाखाली बळीराजाला जीवन कंठावे लागणार आहे. किटाळी, ईसापूर, गुरठा, पालांदूर, खराशी हलक्यात सहा हजार ८६८ हेक्टरमध्ये खरीप धान हंगाम नियोजित आहे. पाच हजार ५१४ हेक्टरमध्ये रोवणी तर एक हजार ५० हेक्टरवर आवत्या पेरणी केली आहे. ९० टक्के रोवणी आटोपली असून पावसाची गरज आहे. -टिकेश्वर गिऱ्हेपुंजे, मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर.