शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
2
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
3
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
4
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
5
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
6
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
7
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
8
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
9
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
10
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
11
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
12
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
13
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
14
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
15
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
16
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
17
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
18
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
19
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
20
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते

पाणीसाठ्याचा योग्य विनियोग करा

By admin | Published: August 17, 2016 12:13 AM

शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा सकारात्मक परिणाम जिल्हयात दिसून येत असून ...

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण : दीपक सावंत यांचे प्रतिपादनभंडारा : शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा सकारात्मक परिणाम जिल्हयात दिसून येत असून जलयुक्त शिवारमुळे जिल्हयात ११ हजार टिसीएम पाणीसाठी निर्माण झाला आहे. या पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले, ते स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदिपकुमार डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर उपस्थित होते. सन २०१५ मध्ये जलयुक्त शिवार अभियानामधील कामावर प्रत्यक्षात ११ हजार ६६२ टिसीएम पाणीसाठानिर्माण झाला आहे. या कामामुळे जिल्हयात १२ हजार ३०२ हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता तयार झाली असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगाम २०१६-१७ करीता जिल्हयात एकूण ३७ हजार ६५० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. त्यापैकी ३९ हजार ८४१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. खरीप हंगामासाठी जिल्हयात ७४ हजार ४०० मेट्रीकटन खतांचे आवंटन मंजूर असून जिल्हयात ४० हजार मेट्रीकटन खत उपलब्ध झाले आहे. जिल्हयात बियाणे व खताची उपलब्धतामुबलक असून याचा काळाबाजार होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने २८८ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. या वर्षी दुष्काळ घोषित केलेल्या ३७१ गावांमधील ५ हजार ५९४ शेतकऱ्यांच्या २३ कोटी ९८ लाख रूपयांच्या कजार्चे रुपांतरण करण्यात आले आहे. तसेच यातील ४ हजार ६६ शेतकऱ्यांना १७ कोटी २२ लक्ष रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये ५७ धान खरेदी केंद्रांना मंजूरी मिळाली होती. त्यानुसार मुदतीत धान खरेदी झाली आहे. जिल्हयात एकूण २७ हजार ९७४ शेतकऱ्यांकडून १० लाख ६० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. त्यासाठी १७० कोटी ८० लाखांचे चुकारे अदा केले आहेत. खरेदी केलेल्या धानापैकी ९ लाख १४ हजार क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. या वर्षात भंडारा जिल्हयाला १५७१ कृषी पंपांना विज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट होते. मार्च २०१६ अखेर२ हजार ६९९ कृषी पंपांना विद्युत पुरवठा करण्यात आलेला आहे. या वर्षी १ते ७ आॅगस्ट या दरम्यान जिल्हयात महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानात महिलांची तसेच जनतेची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी उपविभागीयस्तरावर ३ व ग्रामस्तरावर १४६ महिला मेळावे आयोजित करण्यात आले. या मेळाव्यातून महिलांना शासकीय योजनांच्या माहिती सोबतच २ हजार ३५१ विविध दाखले वितरित करण्यात आले. या सोबतच इंदिरा गांधी निराधार योजनेचे ४९ तर कौटूंबिक अर्थसहाय्य योजनेचे १४९ धनादेश वाटप करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये राबविण्यात येणा?्या चिरंजीव योजनेच्या धर्तीवर राज्यातही चिरंजीव योजना राबविण्यात येणार आहे. राज्यातील ज्या जिल्हयामध्ये माता मृत्यु आणि अर्भक मृत्युंचे प्रमाण जास्त आहे. तेथे ही योजना प्राधान्याने राबविण्यात येणार आहे.महिलांची प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांना दर १०० प्रसुतीमागे ४ लाख रुपये देण्यात येणार असून ही योजना सध्या प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. राजीव गांधी जिवनदायी योजनेतील करार नोव्हेंबर २०१६ मध्ये संपुष्टात येणार असून त्यानंतर ही योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना म्हणून ओळखली जाणार आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये ४ हजार ८०० लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून आतापर्यत १हजार ८८५ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यासाठी आतापर्यंत ३ कोटी २७ लाख रुपये संबंधीत रूग्णालयांना शासनाकडून वितरित करण्यात आले आहेत. मरणोपरांत अवयवदानासाठी स्वंयस्फूतीर्ने नोंदणीे जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये करावे, असे आवाहन त्यांनी केले. जननी सुरक्षा योजना याअंतर्गत सन २०१५-१६ मध्ये ५ हजार ३७८ मातांना लाभ देण्यात आला आहे. त्याचबरोबर जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमातंर्गत माता व नवजात अर्भकांना शासकिय रुग्णालयातून वाहन व्यवस्था, औषधोपचार, तसेच प्रयोगशाळेतील तपासण्या विना शुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्हा परिषद मार्फत सुध्दा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा योजना शहरी व ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविली जात असून २०१५-१६ या वर्षाकरीता ७ हजार ७९५ लाभार्थ्यांना १ कोटी ८ लाखाचे वाटप करण्यात आले आहे. या पुढेही या योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना देण्यात येईल. सन २०१५-१६ मध्ये प्रसुती मातांना दवाखान्यात आणि प्रसुतीनंतर त्यांच्या घरी सेवा देण्यात आाली आहे. भंडारा जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून या वर्षाअखेर जिल्हयात ५९ हजार वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या १५१ ग्रामपंचायती हांगणदारीमुक्त झाल्या असून ८ हजार ८०० वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गोसेखुर्द प्रकल्पातील ११ हजार ४०० लाभार्थ्यांना ३४२ कोटीचे गोसेखुर्द विशेष पॅकेज अंतर्गत वाटप करण्यात आले आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पातील १२८ वाढीव कुटूंबांना ३ कोटी ७१ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. चालु आर्थिक वर्षात १ लक्ष ९१ हजार मजूरांना काम उपलब्ध करुन देण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. यासाठी ८० कोटी २ लक्ष रुपये मंजूरी देण्यात आली आहे. यावेळी विभागाचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)