शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नाही; काही पक्षांची जाणीवपूर्वक ढोंगबाजी: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 15:55 IST

भंडाऱ्यातील रुग्णालयातील दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपच्या वतीने आज भंडाऱ्यात मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काही पक्षांनी आदिवासींची दिशाभूल करुन केवळ ढोंगबाजी करत आहेत असा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते भंडाऱ्यात भाजप आयोजित मोर्चाला संबोधित करत होते. 

भंडाऱ्यातील रुग्णालयातील दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपच्या वतीने आज भंडाऱ्यात मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीसांनी भंडऱ्यातील दुर्घटना हा अपघात असून सरकारी यंत्रणांच्या निष्काळजीपणातून झालेला खून आहे, असं म्हटलं आहे. 

वाढीव वीजबिल माफीवरुन घुमजाव करणारं सरकार"राज्यातील सामान्य जनतेला आलेलं वाढीव वीजबिल माफीची घोषणा उर्जामंत्र्यांनी केली होती. त्यानंतर सरकारनं थेट घुमजाव केलं. अशाप्रकारचा ढोंगबाजी करणारं सरकार आजवर पाहिलेलं नाही. ठाकरे सरकार हे बेईमान सरकार आहे. या सरकारविरोधात लढा अशाच पद्धतीने यापुढील काळतही सुरूच राहील. दिलेला शब्द न पाळलेल्या ऊर्जामंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही", असं फडणवीस म्हणाले. राज्यातील जनतेच्या घरी कुणी वीज कनेक्शन कापण्यासाठी कुणी अधिकारी आलाच तर त्याला गुलाब देऊन त्याच्याच गाडीत बसवून घरी पाठवून द्या, असा सल्लाही फडणवीसांनी यावेळी दिला. 

सरकारची योजना फक्त माल कमविणेमहाविकास आघाडी सरकारला राज्यातील सामन्य जनतेची काहीच पडलेली नाही. केवळ बिल्डरांसाठी हे सरकार काम करत असल्याचाही आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. "केवळ माल कमवणे हीच या सरकारची सर्वात मोठी योजना आहे. धान खरेदीतही मोठा घोटाळा झाला आहे", असं फडणवीस म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhandara Fireभंडारा आगBJPभाजपाFarmerशेतकरीKisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च