शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
2
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
3
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
4
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
5
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
6
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
7
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
8
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
9
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
10
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
11
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
12
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
13
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
14
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
15
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
16
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
17
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
18
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
19
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
20
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?

नेरला उपसा सिंचन योजनेचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2016 12:18 AM

ग्रामीण भागाचा आर्थिक विकास हा शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. अड्याळ व परिसरातील हजारो शेतकऱ्यांना नेरला उपसा सिंचनाविषयी मोठी आशा आहे.

शेतकरी मेटाकुटीस : अड्याळ व परिसरातील शेतकऱ्यांची दैनावस्थाविशाल रणदिवे अड्याळग्रामीण भागाचा आर्थिक विकास हा शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. अड्याळ व परिसरातील हजारो शेतकऱ्यांना नेरला उपसा सिंचनाविषयी मोठी आशा आहे. मात्र, महत्वाकांक्षी नेरला उपसाचे काम अजूनही थंडबस्त्यात असल्साने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.काही शेतकऱ्याच्या क्षणाला लागणारा एक पाणी नाही मिळाला म्हणून हातचे पीक गेले. तर कधी पाण्याअभावी दुबार तिबार पेरणीचे संकट ओढावले आणि मागील काळात तर पाण्याअभावी रोवणीसुद्धा आली नाही. तरी पण येथील शेतकरी राजाने शेती कसणे बंद नाही केले. म्हणतात ना घरीच अळ अन् पाण्याचा लळ हा म्हणजे नेरला उपसा सिंचन आहे. हा सिंचन प्रकल्प जुलै २०१६ ला सुरु होणार असे आश्वासन आमदार रामचंद्र अवसरे व कार्यकारी अभियंता एच.बी. मेंढे यांनी दिले होते. परंतु आजही या सिंचनाचे कामे अर्धेअधिक अपुर्णावस्थेत असताना सिंचन सुरु होणार तरी कसे आणि आलेच तर किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल हाही एक प्रश्नच आहे. सध्या हे सिंचन सुरु होणार असल्याची विश्वसनीय माहिती कार्यकारी अभियंता एच.बी. मेंढे यांनी दिली आहे. परंतु कोणत्या दिवशी होणार हेही सांगितले नाही. नेरला उपसा सिंचन म्हणजे अड्याळ व परिसरातील शेकडो एकरासाठी हरितक्रांती घेवून येणारा आहे. हा प्रोजेक्ट एकूण १,२७६ कोटी रुपयाचा असून आतापर्यंत यावर शासनाने ५०८ कोटी रुपये खर्च केले आहे. मेन वितरण नलीका ही ४३.८०० किलोमिटर एवढी असून आठ किलोमिटरपर्यंत याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे माहितीनुसार ५००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येवू शकत होती. परंतु शाखा कालवे हे अपुर्णावस्थेत असल्यामुळे केवळ ८०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या नेरला लिफ्ट एरिगेशनमध्ये एकूण १२ पंप आहेत. त्यापैकी तीन पंप सुरु करण्यात येणार आहेत. या सिंचनाचे काम पूर्ण व्हायला अजून बराच कालावधी लागणार यात काही शंका नाही. जेव्हा हा पूर्ण होणार तेव्हा याचा लाभ एकुण ११६ गावातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यात पवनी ३८, लाखांदूर १०, लाखनी ६५ व भंडारा तीन अशा चार तालुक्यातील ११६ गावातील २१,७२७ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. नेरला उपसा सिंचन १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनी सुरु होणार म्हणून कार्यकारी अभियंता एच.बी. मेंढे यांनी सांगितले होते.या नेरला उपसा सिंचनाची माहिती जेव्हा नागपुरचे मुख्य अभियंता यांना विचारली असता त्यांनी १२ पंपापैकी तीन पंपची टेस्टींग होणार असल्याची माहिती दिली. नेरला उपसा सिंचन हे लवकरात लवकर सुरु करावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. सिंचन प्रकल्पाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने त्याचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याची माहिती नाही. उद्घाटन झाल्यास याचा फायदा शेतकऱ्यांना होणार हे नक्की. जुलै महिन्यात प्रकल्प सुरु होणार अशी माहिती मिळाली होती. मात्र, अद्याप त्याला विलंब लागेल असेच दिसून येते.- रामचंद्र अवसरे, आमदार भंडाराआमदार अवसरे व कार्यकारी अभियंता मेंढे यांनी जुलै महिन्यात हा सिंचन प्रकल्प सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. येथील कामे अपूर्ण आहेत. नहर, शाखा कालवे, रोड क्रॉसिंग नहरांची अपुर्ण कामे, असतानाही पाणी देऊ म्हणून शेतकऱ्यांची बोळवण करीत आहेत. कम्पलीशन सर्टीफिकेट देता येत नाही व सी.सी. नसेल तर कंत्राटदाराचे देयक काढता येत नाही. -विलासराव श्रृंगारपवार, माजी राज्यमंत्रीया सिंचनामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार. संपूर्ण शेतकऱ्यांना आता होणार नसले तरी त्यातील काहींना होणार यात शंका नाही. हे सर्व शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहे. यामुळे येथील व परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्याचा खरीप हंगामासाठी नक्कीच लाभ होणार.- एच.बी. मेंढे, कार्यकारी अभियंता