शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत येईल, अशी स्थिती...; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
5
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
6
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
7
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
8
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
9
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
10
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
11
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
12
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
13
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
14
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
15
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
16
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
17
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
18
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
19
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
20
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू

४० वर्षांपासून जमिन मालकी हक्काचे पट्टे मिळेना; लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2023 3:42 PM

खुटसावरीतील समता एकता नगरवासी संतप्त

भंडारा : तालुक्यातील खुटसावरी येथील समता एकता नगरवासी गत ४० वर्षापासून जमीन मालकी हक्काचे पट्टे मिळण्याबाबत शासन प्रशानाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना अद्यापर्यत मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले नसल्याने समता एकता नगरवासी संतप्त झाले आहे.

ग्रामपंचायत कार्यालय खुटसावरी अंतर्गत असलेल्या समता एकतानगरवासी गत ४० ते ४५ वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. सध्या या नगरामध्ये जवळपास ८० कुटुंब जीवन जगत आहेत. याठिकाणी स्वस्त धान्य दुकान, अंगणवाडी केंद्र, हनुमान मंदिर यांच्यासह अनेक कुटुंबाला सरकारच्या शासकीय योजनेतून घरकूल बांधकामदेखील मिळालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राजस्व विभागांतर्गत असलेल्या सातबारावर भूमापन क्रमांक व उपविभाग ९७ अंतर्गत एकूण क्षेत्र ५.३२ हेक्टर आर चौरस मीटर आहे. कुळखंड व इतर अधिकारातंर्गत सदर गट निस्तार व चराईकरीता मुकरर म्हणून उल्लेख आहे. या ठिकाणी कोणतेही जंगल नाही. गत ४० वर्षांपासून येथे अनेकांचे पक्के बांधकाम असून एक गावच तयार झालेला आहे. सर्व शासकीय योजना मिळत असताना त्यांना अद्यापर्यत जमीनीचे मालकी हक्काचे पट्टे मिळाले नाही.

समता एकता नगर येथील जवळपास १४० मतदार मतदानाचा हक्क बजावतात. मात्र त्यांना निवडणूक रिंगणात उभे होता येत नाही. जर उभे झाल्यास अपात्रतेची टांगती तलवार दाखवून धमकावले जाते. सरकारकडून अनेकदा विविध शासकीय जमिनींवर अनेक वर्षापासून अतिक्रमण करून असलेल्या रहिवाशांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचे आश्वासन दिले जाते. ४० वर्षांपासून मालकी हक्काच्या पट्ट्यासाठी३० ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित ग्रामसभेत ठराव घेण्यात आलेला आहे. यासंबधीचे निवेदन खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे. मात्र यावर कोणतीच उपाययोजना न झाल्याने समता एकता नगरवासींयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

समता एकता नगरवासीयांना तातडीने जमिनीचे पट्टे द्यावे, यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे. त्याचा प्रशासनाकडे नियमित पाठपुरावा सुरु आहे. राज्य शासनाकडे तसे निवेदन पाठविले आहे. -संदीप खंडाते, सरपंच, खुटसावरी.

समता एकतानगरात गत ४० वर्षापासून अनेक कुटूंब वास्तव्यास आहे. मात्र अद्यापही जमीनीचे पट्टे मिळाले नाही. पट्टे मिळावे, यासाठी नेहमीची लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदने देण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.- रवींद्र वासनिक, समता एकता नगरवासी.

सरकारकडून अनेकदा विविध शासकीय जमिनींवर अनेक वर्षापासून अतिक्रमण करून असलेल्या रहिवाशांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक वर्षांपासून आमचे वास्तव्य असतानाही अद्यापही पट्टे मिळाले नाही. जिल्हाधिकारी महाेदयांनी याकडे लक्ष देऊन जमिनीचे पट्टे मिळविण्यासाठी सहकार्य करावे. -अरुण मांढरे, समता एकता नगरवासी.