शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

चार हजार हेक्टरवरील धानपीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 9:41 PM

शेतकरी म्हंणजे नानाविध समस्यांचे बिऱ्हाड वाहून नेणारे साधन ठरले आहे. जिल्हा प्रशासनाने आश्वासन देऊनही पाणी दिले नाही. त्यामुळे वरठी परिसरातील ४ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतपिक जवळपास करपले आहे. धानपिकाला शेवटचे पाणी वेळेवर दिले नाही आणि आत्ता पाणी दिले तरी पीक येणार नाही अशी परिस्थती निर्माण झाली आहे.

तथागत मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : शेतकरी म्हंणजे नानाविध समस्यांचे बिऱ्हाड वाहून नेणारे साधन ठरले आहे. जिल्हा प्रशासनाने आश्वासन देऊनही पाणी दिले नाही. त्यामुळे वरठी परिसरातील ४ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतपिक जवळपास करपले आहे. धानपिकाला शेवटचे पाणी वेळेवर दिले नाही आणि आत्ता पाणी दिले तरी पीक येणार नाही अशी परिस्थती निर्माण झाली आहे.पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाली असून १०० टक्के दुष्काळजन्य परिस्तिथी निर्माण झाली आहे. वरठी भागातील ४ हेक्टर शेतजमीन ही रामटेक व नागपूर येथील पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. हे क्षेत्र प्रकल्पाच्या टेल म्हंणजे शेवटच्या टोकावर आहे.वरठीसह एकलारी, नेरी, पाचगाव, बोथली, पांजरा, मोहगाव, बीड, सोनुली, सिरसी, जमनी- दाभा आदी परिसरातील शेतकरी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. रविवारी लोकमत प्रतिनिधीने या भागाचा आढावा घेतला असता या भागातील ७० टक्के पीक गेल्यागत जमा आहे. काही भागातील शेतात धान उभे असले तरी त्याला पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होणार असल्याचे दिसते. अनेक शेतात पाणी न मिळाल्याने भेगा पडल्या आहेत.१ आॅक्टोबरला वरठी येथे आंदोलन झाले. यात शेतकऱ्यांना तत्काळ पाणी देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. पण ८ दिवस लोटूनही थेंबभर पाणी मिळाले नाही. पाणी मिळण्याच्या आशेवर शेतकरी होता, पण पाणी मिळाले नाही. शेतकरी विवंचनेत सापडला आहे. दरम्यान पाचगाव व एकलारी येथील शेतकºयांशी चर्चा केली असता त्यांनी आपली व्यथा मांडली. प्रत्येक जण शेतातील पीक दाखवण्यासाठी धडपडत होता. टिकाराम मारवाडे, प्रेमलाल बालपांडे, ताराचंद शहरे, नरेश वंजारी, ग्याशीलाल पटले व संजू गणवीर यांच्या शेतातील पीक पूर्णत: गेल्याचे सांगितले. नेरी येथील राजू हजारे, सेवक मलेवार, प्रल्हाद कारेमोरे, रमेश उमरकर, डोकेपर पांडुरंग किरपाने, वासुदेव हिवसे, लक्ष्मण मारवडे व चंद्रभान रामटेके आणि मोहगाव येथील शेतकऱ्यांनी सारखीच गऱ्हाणी मांडली.जिल्हा प्रशासनाची पोकळ घोषणाशेतकऱ्याचे आंदोलन लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी मिळणार असल्याचे जाहीर केले. या घोषणेला जवळपास आठवडा लोटला, पण अद्याप शेतीला पाणी मिळाले नाही. शेतकरी हवालदिल असताना जिल्हा प्रशासनाने पोकळ आश्वासन देऊन दिशाभूल झाल्याने शेतकरी संतापलेले आहेत. प्रकल्प अधिकाºयाचे असहयोग असताना जबाबदार अधिकारी खोटी घोषणा देत असतील तर शेतकऱ्यांनी न्याय कुणाला न्याय मागायचे. प्रकल्प अधिकारी यांनी तात्काळ पाणी सोडण्याचे तहसीलदार मोहाडी यांना लेखी आश्वासन दिले. आठ दिवस होऊनही शेतकऱ्यांना थेंबभरही पाणी मिळाले नाही. वरठी भागात असलेल्या मोहगाव, डोकेपार, बोथली पांजरा, एकलारी व पाचगाव भागात असलेल्या नहर कोरडेच आहेत. जिल्हाधिकारी यांची भेट घालवून देण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन देत तहसीलदार स्वत: बाहेर गेले.च्प्रकल्पाचे पाणी शेतात नहराच्या माध्यमातून येते. नहराच्या देखभाल दुरुस्तीत गैरप्रकार झाल्याचे दिसते. दुरुस्तीवर खर्च दाखवण्यात येते. मात्र प्रत्यक्षात कुठलेही काम झाले नाही. नहाराची देखभाल दुरुस्ती न झाल्याने गवत उगवले आहे.पाण्याचा निचरा योग्य होणार नाही. यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च दाखवण्यात येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतात असलेले पाणी २०० रुपये तासाप्रमाणे विकत घेऊन पीक वाचवण्यासाठी धडपड सुरु आहे. शेतपिक गेल्याने आर्थिक व मानसिक नुकसान शेतकऱ्यांच्या वाट्याला आले त्याबरोबर आंदोलनात गुन्हे दाखल झाल्याने हेलपाटे घालावे लागणार ती समस्या वेगळी. त्यांच्यामागे कारवाईसाठी ससेमिरा सुरु होणार हे मात्र निश्चित आहे.