शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

धान उत्पादक जगताहेत अधांतरी

By admin | Published: November 19, 2015 12:24 AM

संपूर्ण कुटुंबासह शेतामध्ये राबणारा शेतकरी आजघडीला चिंतायुक्त वातावरणात हलाखीचे जीवन जगत आहे़

धान खरेदी केंद्राचा अभाव : भाव मिळण्यासाठी शासन दरबारी नेतृत्वाची गरजसाकोली: संपूर्ण कुटुंबासह शेतामध्ये राबणारा शेतकरी आजघडीला चिंतायुक्त वातावरणात हलाखीचे जीवन जगत आहे़ बळीराजाने उत्पादन केलेल्या धानाला पुरेसाभाव मिळण्यासाठी सरकारशी भांडणाऱ्या लोकनेत्यांचा अभाव दिसत असल्याने पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे़ धान उत्पादकांचा खंबीर वालीच नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला दिसत आहे़ धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध सोयी सवलती पदरात पाडून, धानाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्यासाठी शासन दरबारी भांडणाऱ्या दमदार नेतृत्वाची आज गरज आहे़ भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांकडून सहानुभूमी मिळवून राजकीय यशोशिखर गाठणारे महाभाग बरेच आहेत़ राज्यातील कापूस, ऊस व इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक सोयी सवलती मिळवून देण्यासाठी तसेच त्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला सारून शासन दरबारी एकत्र भांडणारे लोकप्रतिनिधी राज्यातील काही भागात असल्याने आज कापसाला व इतर पिकाला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे़ तो प्रकार धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत दिसून येत नाही़ गावातील सभामंचावरून शेतकऱ्यांप्रती आत्मीयता दाखविणाऱ्या दमदार लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी धान उत्पादकांच्या व्यथा मांडून त्या दुर सारण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे़ धान उत्पादकांना शेतामधून धानाचे पिक घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते़ त्यातल्या त्यात खताच्या वाढलेल्या किमती तसेच किटकनाशक,वाढलेली मजुरी, बियाणांचे वाढीव भाव, आणि त्यामानाने उत्पादीत मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर गंभिर प्रश्न निर्माण झाला आहे़ अल्प प्रमाणात सबसीडीचे गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार अनेकदा केला जातो़ तसेच निसर्गाच्या अवकृपेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागत आहे़ (तालुका प्रतिनिधी)