शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

कमी पाण्यामध्ये पिकाचे नियोजन करा

By admin | Published: March 29, 2016 12:30 AM

शेतीसाठी व पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या जलस्त्रोताचा योग्य नियोजन करुन जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल.

प्रज्ञा गोळघाटे यांचे प्रतिपादन : पवनी येथे कार्यक्रमपवनी : शेतीसाठी व पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या जलस्त्रोताचा योग्य नियोजन करुन जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल. याबाबत काटकसरीचा वापर करुन कमीतकमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पिकांचे नियोजन शेतकरी बांधवांनी करावे व उत्पादन वाढवावे असे प्रतिपादन प्रकल्प संचालक (आत्मा) प्रज्ञा गोळघाटे यांनी केले.कृषि व्यवस्थापन संस्था (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी पवनी यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेल्या जलजागृती अभियान अंतर्गत सुक्ष्म सिंचन पध्दतीने फायदे व ठिंबक तुषार संचाचे व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडून सेंद्रीय शेतीकडे वळावे व नफा मिळवावा असे सांगुन परंपरागत कृषी विकास, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी आदेशकुमार गजभिये, गोसेखुर्दचे सहायक अभियंता अहिरराव, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एन. बारई, लागवड अधिकारी घरडे, पं.स.चे कृषी अधिकारी वानखेडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पी. पी. पर्वते, नेटाकिमचे कृषी विद्यावेतन धनंजय मेहत्रे, कृषी अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते. जलसंधारण, मृदसंधारण, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, याविषयीची माहिती तालुका कृषी अधिकारी ए. डी. गजभिये यांनी दिली व पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे मार्गदर्शन केले. धनंजय मेहत्रे यांनी पिकांना मोकाट पाणी देण्यापेक्षा ठिंबक व तुषार सिंचन पध्दतीचा वापर करावा असे सांगुन ठिंबक व तुषार सिंचन वापरण्याची पध्दत समजावून दिली. यावेळी सहायक अभियंता अहिरवार, वनपरिक्षेत्र अधिकारी बारई, कृषी पर्यवेक्षक मेश्राम व हुमणे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन पी. पी. पर्वते यांनी तर आभार कृषी अधिकारी वाघमारे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)