शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

राज्य महामार्गावर खड्ड्यांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 9:39 PM

प्रमुख राज्य महामार्ग ११ वर सुकी फाटा ते बरडटोली दरम्यान रस्त्याचे काम सहा महिन्यापूर्वी झाले होते. आता रस्त्याला पुन्हा मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देअपघात वाढले : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : प्रमुख राज्य महामार्ग ११ वर सुकी फाटा ते बरडटोली दरम्यान रस्त्याचे काम सहा महिन्यापूर्वी झाले होते. आता रस्त्याला पुन्हा मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेविषयी शंका व्यक्त केली जात आहे. या रस्त्याने वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत झालेली आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.अर्जुनी मोरगाव येथून कोहमाराच्या दिशेने जाताना ठिकठिकाणी खड्डे दिसून येत आहेत. या खड्ड्यांची खोली मोठी आहे. सदर दुहेरी रस्त्याच्या एका बाजूचे अर्धवट काम गतवर्षी झाले. डांबराच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले.या रस्त्याने वाहतूक करताना वाहनाने हेलकावे घेतले नाही तर नवलच. याच रस्त्याच्या दुसºया बाजूला सुद्धा खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाहन कुठून हाकावे, हा मोठा प्रश्न पडतो. खड्ड्यात वाहन आदळून वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात छोटे मोठे अपघात होत आहेत.अर्जुनी शहराबाहेरील मोरगाव रोड टी पॉर्इंटपासून तर बरडटोलीपर्यंत ठिकठिकाणी रस्त्यावर लांबच लांब खड्डे आहेत. संबंधित विभागाला हे खड्डे कसे दिसत नाही, हा प्रश्न आहे. खड्डे बुजवून त्यावर हॉट मिक्सिंगचे काम केले जात असतानाही परत काही कालावधीतच पुन्हा खड्डे पडण्याच्या प्रकाराला प्रवाशी कंटाळले आहेत.या मार्गाची रुंदी कमी असून या रस्त्यावर सतत वर्दळ असते. अनेकदा अपघातही होतात. त्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे. याकडे लोपकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. एखाद्याच्या जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.