शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

तुरीला १० हजारांचा भाव; शेतकऱ्यांच्या पदरात काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 5:06 PM

शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नाही: नवीन तुरीसाठी सहा महिने प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिन्याभरापूर्वी खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. तुरीची लागवड होऊन पीक फुटव्यांवर आहे. नवीन तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येण्यास सहा महिन्यांचा कालावधी आहे. अशातच जुलै महिन्यात भंडारा व तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीचे दर १० हजार ४०० रुपयांवर गेले आहेत; परंतु सध्या शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नाही. त्यामुळे दर वाढूनही शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गतवर्षी जिल्ह्यात ९ हजार ४४५ हेक्टरवर सलग तसेच धुऱ्यांवर तूरपिकाची लागवड झाली होती. सुमारे ४०.८१ मेट्रिक टन तुरीचे उत्पादन झाले. यंदा ११ हजार ४०० हेक्टरवर तूर लागवडीचे नियोजन असून ६८.४० मेट्रिक टन उत्पादनाचा लक्ष्यांक कृषी विभागाचा आहे. जून महिन्यात लागवड झालेली तूर दुसऱ्या वर्षीच्या जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या हाती येते. हलक्या प्रतीची म्हणजेच अल्पमुदतीची तूर असल्यास डिसेंबर महिन्यातच शेतकऱ्यांच्या पदरी पडते. सध्या शेतकऱ्यांकडे जुनी तूर शिल्लक नाही. त्यामुळे वाढलेले दर शेतकऱ्यांच्या उपयोगी न ठरता व्यापाऱ्यांच्या पदरी पडणारे आहे.

तुरीला आधारभूत किमत किती?• आधारभूत किमत योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने २०२३-२४ या वर्षात तुरीला ७ हजार रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. परंतु, खुल्या बाजारात तुरीला यापेक्षा अधिक भाव दिला जातो.

नवीन तुरीला दर मिळणार काय?• नवीन तुरीचे उत्पादन सहा महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या हाती येईल. तेव्हा नवीन तुरीला बाजारात चांगला दर मिळणार काय, असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. सध्या तुरडाळीला १८० ते २०० रुपयांचा भाव मिळतो आहे.

बाजार समितीत आवक नाही• सध्या तुमसर व भंडारा बाजार समितीत तुरीची आवक नाही. शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नाही. आवक मंदावली असताना दर १० हजारावर गेले आहेत. तूरडाळीचे भावही कडाडले आहे.

शेतकरी काय म्हणतात...सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक नसल्याने तुरीचे भाव वाढले आहेत. परंतु, दर वाढून उपयोग काय? सध्या शेतकऱ्यांकडे सध्या तूर शिल्लक नाही. यामुळे शेतकयांच्या पदरी काहीही पडणार नाही. उलट व्यापारी मालामाल होण्याची शक्यता आहे.- श्रीकांत डोरले, शेतकरी, करडी.

टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र