शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

पीक पद्धत बदलातून कमविला नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:54 PM

तालुक्यातिल बोरी गावातील एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकात बदल करत रक्त चंदनाच्या झाडांची लागवड केली तसेच त्याच ठिकाणि शेवग्याच्या झाडांची लागवड करून कमी खर्चात जास्त नफा मिळवित आहे. त्या किमयागर शेतकऱ्याचे नाव ऋषि खोब्रागडे आहे.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : बोरी येथील यशस्वी उपक्रम, लक्षावधींची उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातिल बोरी गावातील एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकात बदल करत रक्त चंदनाच्या झाडांची लागवड केली तसेच त्याच ठिकाणि शेवग्याच्या झाडांची लागवड करून कमी खर्चात जास्त नफा मिळवित आहे. त्या किमयागर शेतकऱ्याचे नाव ऋषि खोब्रागडे आहे.खोब्रागडे यांच्याकडे वडिलोपार्जित सात एकर शेती आहे शेतीत पारंपरिक पद्धतीने धान पिकांची लागवट करीत असत मात्र धन पिकात लागवतीचा खर्चही कधीकधी निघत नव्हता त्यामुळे खोब्रागडे यांनी धान पिकात बदल करत उसाची शेती केली.या उसाच्या शेतीत त्यांना धान शेतीपेक्षा चांगला नफाही मिळाला मात्र खोब्रागडे हे समाधानीं नव्हते त्यामुळे त्यांनी याच शेतीत काही वेगळा करू शकतो काय याचा विचार केलं,व इंटरनेटच्या र्नेटच्या माध्यमातून नवनवीन पिके लावण्याची माहिती घेतली. खोब्रागडे यांनी रक्त चंदनाची झाडे लावण्याचे ठरविले. त्यांनी एक एकर शेतीमध्ये २८० रक्त चंदनाची झाडे लागवड केली असून हे झाडे मोठे होण्याकरिता १५ वषार्चा कालावधी लागतो. तोपर्यंत यांच्या रिकाम्या जागी काही तरी पीक लागवड करायचे ठरविले. शेवग्याच्या शेंगाची लागवङ केली. शेवग्याच्या शेंगाची बियाणे हि बीड येथून खरेदी करून आणली व १०-१० च्या अंतरावर शेवग्याची बियाणांची लागवड केली. सहा महिन्यांच्या कालावधीत या झाडांना शेवग्याच्या शेंगा लागल्या असून शेवग्याचे झाडे लावण्याकरिता फक्त १० हजार रुपये खर्च आला आहे. या एक एकर शेतीमध्ये एक लाखाचा शुद्ध नफा खोब्रागडे यांना मिळत आहे. रक्त चंदनाच्या झाडांची आजघडीला एक झाडाची किंमत ही एक लाख रुपये आहे. येत्या काही वर्षात खोब्रागडे यांना दोन कोटीच्या वर उत्पन्न मिळू शकते. तर त्यांच्याकडे असलेल्या शेतीपैकी दोन एकर शेतीमध्ये उसाची लागवड केली आह. दोन एकर शेतीला ५० हजार रुपये खर्च आला असून दोन लाखाचा उत्पन्न होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. , एकंदरीतच खोब्रागडे यांना तीन एकर शेतीत शेवगा व उसाला ६० हजार रुपये खर्च आला असून तीन लाख रुपये उत्पन्न होणार आहे. ६० हजार खर्च वजा केला असता दोन लाख चाळीस हजार रुपये शुद्ध नफा खोब्रागडे यांना मिळणार आहे. खोब्रागडे यांच्या शेतावर काही शेतकरी भेटी देत असून इतरही शेतकरी आपल्या शेतावर या पद्धतीची शेती लागवड करणार असल्याचे सांगत आहे, शासनाची कोणतीच मदत नसतांनी शेतकºयांनी संशोधन करुन आर्थिक प्रगती करीत आहेत किमान कृषि विभागाने बांधावर जावून मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी