शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

जलयुक्त शिवारामुळे स्रोताला फुटतोय पाझर

By admin | Published: March 26, 2016 12:32 AM

जिवती तालुक्याला दरवर्षीच पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. अनियमित पावसामुळे तसेच तसेच अल्पवृष्टीमुळे येथील जनजीवन उन्हाळ्याच्या दिवसांत प्रभावित होते.

जनावरांना पाण्याची सोय : पिकांनाही मिळणार पाण्यामुळे जीवदान, शेतकरी सुखावलेशंकर चव्हाण/संघरक्षित तावाडे जिवतीजिवती तालुक्याला दरवर्षीच पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. अनियमित पावसामुळे तसेच तसेच अल्पवृष्टीमुळे येथील जनजीवन उन्हाळ्याच्या दिवसांत प्रभावित होते. एवढेच नाही तर जनावरांनाही याचा फटका सहन करावा लागतो. मात्र यावर्षी या तालुक्याचे चित्र काही अंशी पालटले आहे. शासनाच्या जलशिवार योजनेमुळे या परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार आहे.जिवती तालुक्यात शासनाची जलशिवार योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली आहे. गेल्या एक-दोन वर्षांत शासनाचे हे काम सुरळीत सुरू आहे. या योजनेंतर्गत शेत तलाव, वनतलाव, सिमेंट बंधारे याद्वारे या योजनेंतर्गत शेत तलाव, वनतलाव, सिमेंट बंधारे याद्वारे पाण्याचा साठा कसा होईल आणि शेती वा जनावरांच्या उपयोगी तो पाणी साठा कसा उपयोगी येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहे. आजच्या स्थितीत जिवती तालुक्यात जलशिवाराची कामे समाधानकारक आहेत. बंधारा असो की तलाव यामध्ये थोड्याप्रमाणात पाणी साचून आहे. हे पाणी जरी शेतीला कामात येत नसले तरी पाळीव तसेच जंगली प्राण्यांची तहाण भागवित आहे. जलशिवार योजनेनंतर परिसरातील नैसर्गिक झऱ्यांनाही पाझर फुटल्याचे दिसत आहे. ही योजना राबविण्यात वनविभाग, कृषी विभाग, जलसंधारण विभाग यांनी मोलाचा पुढाकार घेतला आहे. जीवती तालुक्यातील नागरिकांना दरवर्षीच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाच्या जलशिवार योजनेचा या तालुक्याला फायदा मिळावा या हेतूने तत्कालिन कृषी अधिकारी राज वानखेडे यांनी ही योजना भक्कमपणे राबविली. जलशिवार योजनेंतर्गत करण्यात आलेली कामेशासनाच्या जलशिवार योजनेंतर्गत शेत तळे, वन तळे, सिमेंट बंधारे, ढाळीचे बंधारे, नाल्यातील उपसा काढून दगडाने पाणी अडविणे यासारखी कामे करण्यात आलीत. दगडाने बंधारा बांधून त्यावर जाळी पसरविणे, याला जाळीचे बंधारे म्हणतात. ही कामे जिवती तालुक्यात कृषी विभाग, वनविभाग आणि जलसंधारण विभागाने केलीत.योजनेतून लोकांना मिळाला रोजगारजलशिवार योजनेअंतर्गत तलावाची, बंधाऱ्याची विहिरीची जी कामे झालीत, त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या हाताला रोजगार मिळाला. एकीकडे या योजनेमार्फत पाण्याचा साठा वाढविता आला तर दुसरीकडे मजुरांना रोजंदारी मिळाली, हे विशेष.