शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा
4
Ratan Tata's Will : वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती?
5
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
6
मोगँबोच्या नातवाला पाहिलंत का? दिसायला इतका देखणा की स्टारकिडला देतोय टक्कर
7
किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO)
8
भाजपाला रामराम करत संजयकाका पाटील अजित पवार गटात; कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर
9
निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड
10
लेख: माझ्यावर हल्ला? -आता तुमची शंभरी भरली! आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील!
11
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
13
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
14
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
15
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
16
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
17
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
18
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
20
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका ठरली रोजगाराचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:27 AM

चिखलीसह परिसरात आजही मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले जात. मात्र यासाठी शेतकऱ्यांना दूर अंतरावरून मिरचीची रोपे आणावी लागत होती. ...

चिखलीसह परिसरात आजही मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले जात. मात्र यासाठी शेतकऱ्यांना दूर अंतरावरून मिरचीची रोपे आणावी लागत होती. यासाठी अधिकचा खर्च मोजावा लागत होता. शिवाय रोपे दर्जेदार नसल्याने पाहिजे असलेले वाहन मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अल्प उत्पादन व्हायचे. मात्र कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांनी परिसरातील शेतकर्‍यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आपल्या रोपवाटिकेतून कमीत कमी खर्चात शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार त्यांना पाहिजे असलेल्या वाणाची रोपे देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे खरीप हंगामापूर्वी त्यांच्याकडे आतापर्यंत दोन लाख मिरची, वांगे रोपांची ऑर्डर बुक झाली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना पाहिजे असलेल्या वाणाच्या प्रजातींसह दर्जेदार रोपांची रोपवाटिकेत लागण केली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या शेतात भाजीपाला लागवड आधुनिक पद्धतीने केली असून, एक एकरातील भाजीपाल्यातून त्यांनी चांगले उत्पन्न मिळवले आहे. यासोबतच त्यांनी गावातील आठ महिलांसह दोन पुरुषांना कायमस्वरूपी रोजगार दिल्याने त्यांची भटकंती थांबली आहे. त्यामुळे खऱ्याअर्थाने कृषी विभागाची अहिल्यादेवी रोपवाटिका ही शेतकरी तानाजी गायधने यांच्यासह गावातील मजुरांना अर्थार्जनाचे साधन ठरली आहे. रोपवाटिकेसाठी भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, शांतिलाल गायधने, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी सहायक रेणुका दराडे, खेमा टिचकुले, कृषीमित्र श्याम आकरे यांचे सहकार्य मिळाले आहे.

कोट

मी अर्ध्या एकरात कृषी विभागातर्फे अहिल्यादेवी रोपवाटिका उभारली आहे. या रोपवाटिकेतून शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मिरची व भाजीपाला, फळपिकांची रोपे देण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे गावातील मजुरांना रोजगार मिळालाच; शिवाय शेतकऱ्यांकडून आतापर्यंत दोन लाख रोपांचे बुकिंगही झाले आहे.

तानाजी गायधने, कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी, चिखली

कोट

शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकांसह फळबाग लागवडीकडे कल वाढला आहे. त्यामुळे दूरवरून रोपे विकत आणण्यापेक्षा परिसरातील शेतकऱ्यांची गरज ओळखून भंडारा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना अहिल्यादेवी फळ रोपवाटिकेचा लाभ दिला आहे. त्यांना दर्जेदार रोपे निर्मितीसाठी सातत्याने भेटी देत मार्गदर्शन कृषी विभागातर्फे केले जात आहे.

अविनाश कोटांगले, तालुका कृषी अधिकारी, भंडारा