शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

पावसाची दडी, धान संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 9:46 PM

दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने धान पीक संकटात आले आहेत. जमिनीला तडे जात असून पाण्याअभावी शेतातील धानाची कोवळी रोपटी सुकू लागली. तर काही तालुक्यात खोड कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. सुरूवातीला रोवणी झालेल्या पिकांची स्थिती उत्तम असली तरी १५ जुलैनंतर रोवणी झालेल्या धानाला मात्र पावसाच्या दडीचा फटका बसत आहे.

ठळक मुद्देजमिनीला भेगा : रोपटी सुकू लागली, आठ दिवसात पाऊस न आल्यास उत्पन्नावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने धान पीक संकटात आले आहेत. जमिनीला तडे जात असून पाण्याअभावी शेतातील धानाची कोवळी रोपटी सुकू लागली. तर काही तालुक्यात खोड कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. सुरूवातीला रोवणी झालेल्या पिकांची स्थिती उत्तम असली तरी १५ जुलैनंतर रोवणी झालेल्या धानाला मात्र पावसाच्या दडीचा फटका बसत आहे.जिल्ह्यात एक लाख ८२ हजार हेक्टर धान लागवट क्षेत्र आहे. यंदा सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सुमारे ८५ टक्के धानाची रोवणी आटोपली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३० मिमी आहे. १ जून ते २२ जुलैपर्यंत सरासरीच्या ८७ टक्के पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ५८०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र २३ जुलैपासून पावसाने दडी मारली. दहा दिवसात पावसाची एक सरही कोसळली नाही. या दडीचा परिणाम शेतीवर होत आहे.जिल्ह्यात सुरूवातीला पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. परंतु १५ जुलैनंतर रोवणी झालेले भात पीक सध्या धोक्यात आले आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांची परिस्थिती चांगली आहे. परंतु निसर्गावर अवलंबुन असलेल्या शेतांमध्ये दुष्परिणाम दिसू लागल ेआहेत. अनेक शेतात आता भेगा पडत आहे. आठ दिवसात पाऊस आला नाही तर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच भेगांचा परिणाम पिकांवर होवू नये यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता असते. विशेष म्हणजे गतवर्षी पावसाने ताण दिल्याने आॅगस्टच्या शेवटपर्यंत रोवणी गेली होती. मात्र यंदा सुरूवातीला पाऊस झाल्याने जुलैच्या शेवटपर्यंत जिल्ह्यात सुमारे ८५ टक्के पेरणी झाली आहे. आता पावसाअभावी धानाचे पीक पिवळसर पडत आहे. काही भागात वाढत्या तापमानामुळे पीके सुकू लागली आहे. गत आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम कीडींचा प्रादूर्भाव वाढविण्यात झाला आहे. काही भागात खोड कीडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. आर्थिक नुकसान पातळीवर खोडकीडी सध्या नसली तरी पावसाने आणखी ताण दिल्यास कीडींचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे.धान पिकासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात गरज असते. परंतु दहा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनातून शेततलाव तयार करण्यात आले आहे. या शेततलावाचे पाणी धान पीकासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.धान उत्पादक शेतकºयांच्या हृदयाचे ठोके वाढले असून पावसाने आणखी ताण दिल्यास पीक हातचे जाण्याची शक्यता आहे. सर्वांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहे. मात्र जो दिवस उगवतो तो चक्क प्रकाश घेवूनच.वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणामपावसाच्या दडीमुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उन्हाळ्यासारखे उकळत असून दमट वातावरणामुळे जीव घाबरा होत आहे. तसेच विषानुजन्य आजार बळावले आहेत. ग्रामीण भागात ताप, सर्दी, खोकला आदी आजार वाढले असून शासकीय रुग्णालयात अशा रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.पावसाने दडी मारल्याने शेतीसोबत माणवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. उशिरा पेरणी करणाºयांची शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे. येत्या आठ दिवसात पाऊस आला नाही तर त्याचा उत्पादनावर परिणाम होवू शकतो.-डॉ. जी.पी. श्यामकुंवर, भात उत्पादक शेतकरी, साकोली.वाढत्या तापमानामुळे काही भागातील पीके सुकायला लागली आहेत. जिल्ह्यात २० टक्के पेरण्या बाकी आहे. पाण्याची सोय नसलेले शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.-डॉ. उषा डोंगरवार, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख, साकोली.