शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मोहाडी तहसील कचेरीचा कारभार रामभरोसे

By admin | Published: January 03, 2016 1:11 AM

येथील नियमित तहसीलदारांचे स्थानांतरण झाल्यानंतर काही काळ नायब तहसीलदारांकडे प्रभार देण्यात आला.

कामे खोळंबली : तहसीलदार प्रभारी, तर नायब तहसीलदार रजेवरसिराज शेख मोहाडीयेथील नियमित तहसीलदारांचे स्थानांतरण झाल्यानंतर काही काळ नायब तहसीलदारांकडे प्रभार देण्यात आला. मात्र तेही रजेवर गेल्याने भंडारा येथील सहायक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना येथील प्रभार देण्यात आला आहे. आठवड्यातून दोन तीन दिवस येथे ते येत आहेत. तसेच दोन्ही नायब तहसिलदार दीर्घ रजेवर असल्याने मोहाडी तहसिल कार्यालय कधी कधी अधिकारीविना कार्यालयाचा कारभार सुरु आहे.याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून ते संताप व्यक्त करीत आहेत.सर्वसामान्य नागरिकांचा नेहमी तहसिल कार्यालयाशी संबंध येत असतो. त्यामुळे तहसील कार्यालयात दररोजच नागरिकांची गर्दी पाहण्यास मिळते. अशात जर अधिकारी सुटीवर असले किंवा जागेवर नसले तर नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. सोबतच आर्थिक फटका बसतो. असाच काहीशा प्रकार मोहाडी तहसील कार्यालयात सुरू आहे. येथील तहसीलदार जयराम सूर्यवंशी यांची बदली झाल्यानंतर जवळपास एक महिना येथीलच नायब तहसीलदार हरीभाऊ थोटे यांच्याकडे प्रभारी तहसीलदाराचा भार देण्यात आला होता. त्यांनी वैद्यकीय रजा घेतली. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी भंडारा येथील सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी जयंत पोहणकर यांना मोहाडी तहसीलदार म्हणून प्रभार देण्यात आला. मात्र त्यांच्याकडे भंडारा व मोहाडी अशा दोन कार्यालयाचा कारभार असल्याने ते नियमित मोहाडी कार्यालयात उपस्थित राहत नाही. येथील दुसरे नायब तहसीलदार युवराज गणवीर हे १७ डिसेंबरपासून दीर्घ रजेवर गेलेले असून एक जानेवारीला सुद्धा ते रूजू झालेले नाहीत. तहसीलदार नियमित उपस्थित राहात नाही व दोन्ही नायब तहसीलदार रजेवर गेलेले असल्याने सामान्यांच्या कामाचा मोठा खोळंबा होत आहे. मात्र याकडे प्रशासनाने अजिबात लक्ष नाही. एखाद्या कामासाठी तहसिल कार्यालयात गेल्यास अधिकारीच उपस्थित नाही तर कामे कशी होणार, असा प्रश्न तेथील कर्मचारी करतात. मात्र यामुळे तहसील कार्यालयात दुरवरून येणाऱ्या नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. यात दोष कुणाचा, असा प्रश्न उपस्थित होतो. उत्पन्नाचा दाखला, शपथपत्रासह विविध प्रकारच्या दाखल्यावर तहसीलदार किंंवा नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीची आवश्यकता असते. मात्र मोहाडी येथे एकही प्रकारचे तहसीलदार दररोज उपस्थित राहत नसल्याने साधे शपथपत्रासाठीही वारंवार नागरिकांना तहसील कार्यालयाच्या येरझाऱ्या घालाव्या लागत आहे.मोहाडी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार सध्या नायब तहसीलदार युवराज गणवीर यांच्याकडे आहे. मात्र ते मागील १७ डिसेंबरपासून रजेवर असल्याने नगर पंचायतीचाही काम रखडलेला आहे. रोजंदारी मजुरांचे मानधनही अडकलेले आहेत. तसेच धान्य पुरवठा विभाग ना.त. गणवीर यांच्याकडेच असल्याने व त्यांनी आपला कार्यभार दुसऱ्याकडे न सोपविल्याने त्या विभागाचे कामही अडकलेले आहेत. राशन कार्डाचे कामही तुर्तास बंद आहेत. यामुळे सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष दिल्यास माहाडीवासीयांना दिलासा मिळेल.