शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सानगडी येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 05:00 IST

रास्ता रोको आंदोलनानंतर शिवमंदिर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, साकोलीचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर शिंदे, डोंगरगाव डीसीचे साहाय्यक अभियंता अजय गेडाम व लेखापाल नंदकिशोर शहारे यांनी आंदोलनात सहभागी सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी प्रत्येक दिवशी चक्राकार पद्धतीने आठ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यातील सासरा, सानगडी संयुक्त किसान समितीच्या वतीने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात कृषिपंपांना अखंडित १० तास वीजपुरवठा व्हावा व इतर मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बसस्थानकाच्या चौकात  जाहीर सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संयुक्त किसान समितीचे अध्यक्ष किशोर बारस्कर होते. सभेत शैलेश गणवीर, राजू बडोले, राजेश पोवनकर, भाऊराव गोटेफोडे, विनायक नंदरधन, भास्कर ईटवले, हंसराज नगरकर, चंद्रशेखर गायधने, गोपाल पोवनकर, प्रकाश गोटेफोडे, अरुण गोटेफोडे यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर बसस्टँड चौकात प्रतीकात्मक रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. रास्ता रोको आंदोलनानंतर शिवमंदिर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, साकोलीचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर शिंदे, डोंगरगाव डीसीचे साहाय्यक अभियंता अजय गेडाम व लेखापाल नंदकिशोर शहारे यांनी आंदोलनात सहभागी सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी प्रत्येक दिवशी चक्राकार पद्धतीने आठ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात येईल. काही कारणांमुळे वीज खंडित झाल्यास तेवढी वेळ वाढवून देण्यात येईल. सभेचे संचालन व झालेल्या सामूहिक चर्चेनंतर जगदीश ईटवले यांनी आभार प्रदर्शन केले. १५ दिवसांत सर्व मागण्यांची व्यवस्थित पूर्तता झाली नाही तर साकोली येथील विद्युत कंपनीच्या विभागीय कार्यालयावर सानगडी ते साकोली असा पायी मार्च काढून बेमुदत उपोषण आंदोलन  आंदोलन करण्यात येईल, याला जवाबदार शासन राहील, असा इशारा शिवकुमार गणवीर यांनी दिला.

अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे- थकीत वीज बिलामध्ये शासनाने दिलेल्या सवलतीचा फायदा शेतकऱ्याने घेऊन त्यांची  खंडित केलेली वीज जोडून देण्यात येईल.  मीटर जळण्याच्या कारणांची माहिती घेऊन नैसर्गिकरीत्या जळलेले मीटर विनामूल्य लावून देण्यात येतील. यापुढे रीडिंगप्रमाणे बिल देण्यात येतील व आतापर्यंत दिलेल्या सरासरी बिलामध्ये दुरुस्ती करून देण्यात येईल. डीपीच्या  व लाईनच्या देखभालीचे काम निर्धारित वेळेवरच करण्यात येतील व शासनाच्या नवीन योजनेप्रमाणे शक्य तेवढ्या लवकर शेतकऱ्याला नवीन वीज कनेक्शन देण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. आता आश्वासनाची पूर्ततेकडे सानगडी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप