शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना इतिहासजमा

By admin | Published: November 17, 2015 12:41 AM

बपेरा गावाच्या हद्दीत बांधकाम करण्यात आलेली सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना इतिहास जमा होणार असल्याचे दिसून येत आहे.

योजना भंगारात : गावात अभिनव जलकुंभ, शासनाची निष्क्रियता कारणीभूतरंजित चिंचखेडे चुल्हाड(सिहोरा)बपेरा गावाच्या हद्दीत बांधकाम करण्यात आलेली सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना इतिहास जमा होणार असल्याचे दिसून येत आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांना शुध्द पाणी मिळाले नाही. ही शोकांतिका आहे.वैनगंगा व बावनथडी या बारमाही वाहणाऱ्या नद्याच्या खोऱ्यात बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावे आहेत. पंरतु नियोजन शुन्यतेमुळे या गावात भर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करण्याचे संकट गावकऱ्यांवर येत आहे. या गावात नळ योजना असून गावकऱ्यांची तहान भागवित असले तरी शुध्द पाणी पुरवठ्याची 'नो गॅरंटी' आहे. या नळ योजनांनी जलशुध्दीकरणाची सोय नाही. नदीपात्रातून उपसा करण्यात येणारे पाणी थेट नागरिकांना दिले जात आहे. जलकुंभात केवळ ब्लिचींग पावडरचा आधार आहे. दरम्यान या गावांना शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम करण्यात आले आहे. या योजनेचे गावा-गावात अभिनव जलकुंभ उभ्या करण्यात आलेल्या आहेत.या योजनेने सुरुवातीपासुन कटुसत्य अनुभवले आहे. योजनेच्या विकासामुळे सातत्याने लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष झाले आहे. या जिल्हा परिषद क्षेत्रातुन खासदार झाले. या शिवाय जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद मिळाले आहे. पंरतु या पदाचा उपयोग तहान भागविण्यासाठी झाला नाही. या परिसरात येरली आणि सिहोरा अशा दोन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना निरंतर सुरु आहेत. पंरतु प्रशासनाला सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला न्याय देता आले नाही.सध्या या योजेनत लोखंडी साहित्य लंपास झाली आहेत. विजेची उपकरणे चोरीला गेली आहेत. अनेक साहित्यांना गंज चढलेला आहे. केवळ योजनेचा सांगाडा शिल्लक आहे. पुन्हा या योजनेची पुर्नबांधणी करतांना लाखो रुपयाची गरज पडणार आहे. विजेचे देयके थकल्याने विज वितरण कंपनी कान टवकारुन आहे. विज पुरवठा आधीच खंडीत करण्यात आला आहे. या योजनेची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. सुरक्षा करणे करिता योजनेत आता काही शिल्लक नाही. पाण्याला ग्रामीण भागात पुण्य समजले जात असताना यंत्रणा किती गंभीर आहे. त्याचे हे ताजे उदाहरण आहे. हक्काचे पाणी पुरवठा योजना नियोजनाअभावी लंगडी झाली आहे. या योजनेची अभिनव टाकी देवरी (देव) गावात आहे. या टाकीचे एक बुंद पाणी अनुभवला नाही. गावात टाकी असल्याने अन्य योजना मंजुर करताना डोकदुखी होत आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर यांचे गृहगाव आहे. त्यांचे नळ योजना मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या जिल्हा परिषद क्षेत्रात तिन महिला नेतृत्व करीत आहेत. या शिवाय बहुतांश गावात महिला सरपंच आहेत. पाण्याची असणारी झळ त्यांनी अनुभवली आहे. त्यामुळे त्यांनी ग्रामसभेत योजना पुर्ववत सुरु ठेवण्यासाठी ठराव घेण्याचे पाऊल उचलले आहे. या योजनेसाठी राजकीय इच्छेसह पुढाकाराची गरज निर्माण झाली आहे.