शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जाणार पडद्याआड ! जलकुंभावर जल जीवन मिशनचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 15:26 IST

केला फक्त तगरंगोटीवर खर्च : २ लाख ६५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : नागरिकांना जलशुद्धीकरण आणि प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी सुकळी नकुल प्रादेशिक पाणी पुरवठा बपेरा गावाचे हद्दीत तयार करण्यात आली. योजनेची जलवाहिनी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावात देण्यात आली. या योजनेचे अभिनव जलकुंभ निर्माण करण्यात आली. गुंडभर पाणी योजनेने नागरिकांना दिले नसताना योजनाच गुंडाळण्यात आली आहे. या योजनेच्या जलकुंभावर जल जीवन मिशनने ताबा घेतला आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पडद्याआड गेल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. 

बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी सुकळी नकुल प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. योजनेला जागा मिळाली नसल्याने बपेरा गावाचे हद्दीत ही योजना साकारण्यात आली आहे. योजनेला जलशुद्धीकरण केंद्र असल्याने जिल्हा परिषद क्षेत्रातील देवरी देव, सुकळी नकुल, बपेरा, देवसर्रा, बिनाखी, गोंडीटोला, ब्राह्मणटोला, महालगाव, वारपीडकेपार, सोंड्या, गावात जलवाहिनी घालण्यात आली.

या योजनेचे गावात अभिनव जलकुंभ तयार करण्यात आले. जलवाहिनी आणि जलकुंभ बांधकामावर कोट्यवधी खर्च करण्यात आले. बावनथडी नदीवर पंपगृह देण्यात आले. योजनेपासून गावांचे आंतर १२ किमी अंतरावर असल्याने विलंब पाणीपुरवठा करण्याची अपेक्षा गावकऱ्यांना होती. परंतु झाले उलटेच कोट्यवधी खर्चुनही योजनेचे पाणी गावात पोहचले नाही. 

पुन्हा गावकऱ्यांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन हर घर नल योजना गावात मंजूर करण्यात आली. परंतु या योजनेने नागरिकांचा विश्वास संपादन केला. नसल्याने सर्वेक्षण करताना गावात विरोध होऊ लागला आहे. गावातील नळ योजनाच बरी, असे ठणकावून सांगितले आहे. परिसरात बहुतांश गावात जल जीवन मिशन हर घर नल योजना देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून एक थेंब पाणी नागरिकांचे दारात पोहचले नाही. जल जीवन मिशन हर घर नल योजनेच्या प्रस्तावित कामाची विभागीय चौकशी करण्याची ओरड सुरू झाली आहे.

२ लाख ६५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.बिनाखी गावात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ तयार करण्यात आलेला आहे. या जलकुंभात ग्रामीण नळ योजनेची जलवाहिनी जोडण्यात आली आहे. जलकुंभाच्या दुरुस्तीवर २ लाख ६५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे फलकात नमूद करण्यात आले आहे.

तरीही गावकरी तहानलेलेच !नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, जल जीवन मिशन हर घर नल योजना अशा योजना राबविण्यात आलेल्या आहेत. परंतु योजना नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करू शकल्या नाहीत, विशेषतः जल जीवन मिशन हर घर नल योजना वादग्रस्त ठरली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराwater shortageपाणीकपात