शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 9:42 PM

पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे. जिल्हयात पिक कर्ज वाटपासाठी महसूल विभागाच्या प्रयत्नाने ५५ हजार खातेधारक शेतकºयांना २२७ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हयातील वर्ग-२ च्या शेतजमीनी वर्ग-१ मध्ये समाविष्ट करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून सद्यस्थितीत ७० टक्के काम झालेले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : शेतकऱ्यांना सव्वादोन कोटींचे पीक कर्ज वितरीतलोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे. जिल्हयात पिक कर्ज वाटपासाठी महसूल विभागाच्या प्रयत्नाने ५५ हजार खातेधारक शेतकºयांना २२७ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हयातील वर्ग-२ च्या शेतजमीनी वर्ग-१ मध्ये समाविष्ट करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून सद्यस्थितीत ७० टक्के काम झालेले आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत ९५ टक्के शेतजमीनी वर्ग-१ होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.लाखनी येथील स्वागत लॉन येथे आयोजित जिल्हास्तरीय महसुल दिन कार्यक्रमाच्या उदघाटनपर भाषणात ते बोलत होते. यावेळी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, अर्चना मोरे, स्मिता पाटील, तहसिलदार संजय पवार, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक पाटील, लाखनीच्या नगराध्यक्ष ज्योतीताई निप्पाणे, मुरमाडीचे सरपंच सुनील भालेराव उपस्थित होते.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, २०१९ हे वर्ष निवडणूकीचे वर्ष असणार असून भारत सरकार निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार कोणताही दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहता कामा नये. यासाठी समस्त जागरुक नागरिक व कर्मचाºयांनी दखल घ्यावी. सर्व नागरिकांची अचुक मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात ई-वे आॅफिस संकल्पना राबविण्यात येत असून अर्जदारांच्या तक्रारींची दखल गंभीरतेने घेण्यात येईल. अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधितांना कळविण्यात येईल, असे ते म्हणाले.या प्रसंगी आमदार रामचंद्र अवसरे म्हणाले की, राजस्व विभाग हे महत्वाचे असून समस्त नागरिकांचे जीवन या विभागावर अवलंबून आहे. वर्षानुवर्षे अतिक्रमण पट्टेधारक शेतकºयांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.प्रास्ताविकात अर्चना मोरे यांनी महसुल विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाºया योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या जात आहे.तसेच साताबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. या महसूल दिन कार्यक्रमात मान्यवरांचे सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत २० लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश, नैसर्गिक आपत्ती योजनेतील १२ लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्यतेचे धनादेश, सातबारा वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रुपांतरण झालेले ११ लाभार्थी, राशन कार्ड धारक ८ लाभार्थी तसेच मतदान ओखळपत्राचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी जिल्हयातील राजस्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना प्रशस्ती व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन सोमनाथ माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन तहसिलदार मलीक विरानी यांनी केले. या कार्यक्रमास सातही तहसिलचे तहसिलदार, अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.