शहरं
Join us  
Trending Stories
1
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
2
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
3
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
4
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
5
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
6
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
7
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
8
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
9
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
10
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
12
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
13
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
14
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
15
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
16
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
17
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
19
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
20
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली

आमदारांकडून प्रकल्प अधिकाऱ्याची झडती

By admin | Published: August 26, 2016 12:32 AM

जिल्ह्यातील एकमेव शासकीय आश्रमशाळा खापा (खुर्द) येथे नेहा हनेश उईके (१४) रा.कारली येथील निवासी विद्यार्थिनीने

नेहा उईके आत्महत्या प्रकरण : आत्महत्येचे गूढ अद्याप कायम आलेसूर : जिल्ह्यातील एकमेव शासकीय आश्रमशाळा खापा (खुर्द) येथे नेहा हनेश उईके (१४) रा.कारली येथील निवासी विद्यार्थिनीने वस्तीगृहातील कक्षेत पंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केली. त्यामुळे गावखेड्यात पुन्हा गाड्यांच्या ‘रेला रे’ सुरु झाला आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत आमदार चरण वाघमारे दोन दिवसापासून सखोल चौकशी करीत आहेत. यात प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरत तासभर घटनास्थळी झडती घेतली. अभ्यासू आमदार असल्यामुळे आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले असता चांगलाच घाम फुटला. या घटनेचे पोलीस तपासाची चक्रे तीव्र गतीने फिरत असूनही आत्महत्येचे गुढ रहस्य कायम आहे.या आश्रमशाळेत निवासी तथा अनिवासी मुले ७३ व मुली ८८ अशी एकूण १६१ पटसंख्या आहे. मात्र या घटनेच्या सावटात निम्मे विद्यार्थ्यांनी आपल्या पाऊलवाटा घराकडे वळविल्या आहेत. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत शैक्षणिक सुविधा असूनही उपस्थितीअभावी कित्येक वर्गखोल्या ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या प्रकरणात आमदार चरण वाघमारे यांनी आश्रमशाळेची पाहणी केली. यात मूलभूत सुविधेअंतर्गत बऱ्याच समस्या दिसून आल्या. शाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका, शिक्षक व कर्मचारीवृंद यांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेले निेर्देश जणू वेशीवर टांगल्याचे निष्पन्न झाले. परिणामी या घटनेत कोणाचे जहाज बुडते हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. वस्तीगृहातील कोठीघरात तांदूळ, तुरडाळ, पुरवठाधारकाकडून उच्चतम गुणवत्तेचा नसून अप्रमाणित चाचणी न केलेला पुरवठा अन्न शिजविण्यात येणाऱ्या पाण्याचा ड्रममध्ये गढूळ पाणी, दैनंदिन आहारात फेरबदल, विद्यार्थ्यांना मिळणारे बेडींग साहित्य, जोडे मोजे नाईट ड्रेस, टॉवेल, दंतमंजन, साबण, खोबरेतेल, नास्ता या दैनंदिन व जीवनावश्यक वस्तूत रेकॉर्ड अंतर्गत बरीच तफावत आढळून आली. शैक्षणिक गुणवत्तेअंतर्गत आमदार व विद्यार्थ्यांच्या संवादात, इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञानात कित्येक प्रश्न अनुउत्तरीत होते. त्यामुळे बौद्धीक व सर्वांगिण विकासासाठी शिक्षकांची भूमिका बघ्याची ठरली. शासनाकडून दरवर्षी मिळणारा लाखो रूपयाचा निधी झिरपतो कुठे हा प्रश्न उभा झाला आहे. (वार्ताहर)जिल्ह्यात पावसाची हजेरीभंडारा : मागील २० दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पावसाने भंडारा, तुमसर, लाखनी, साकोली परिसरात पावसाने हजेरी लावली. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे येत असली तरी पाऊस मात्र काही पडत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी यावर्षी शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागणार आहे.याावर्षी पावसाने पहिलेपासूनच दगा दिला आहे. आतातरी पावसाने अंत पाहू नये यासाठी शेतकऱ्यांचे यज्ञ सुरू आहे. जन्माष्टमीपर्यंत पूर्ण होणारी रोवणी यावर्षी अर्ध्यावरच राहिली आहे. (नगर प्रतिनिधी)