शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

‘घरपोच’ योजनेविषयी धान्य दुकानदारांत संभ्रम

By admin | Published: December 28, 2015 12:57 AM

घरपोच योजनेचा शुभारंभ जिल्ह्यात डिसेंबर महिन्यापासून झाला. परंतु योजनेत नमूद सुविधा आदी मिळत नसल्याने गोदामातील हमालांनी संप पुकारला होता.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : धान्य दुकानदारांनी मागितले मार्गदर्शनतुमसर : घरपोच योजनेचा शुभारंभ जिल्ह्यात डिसेंबर महिन्यापासून झाला. परंतु योजनेत नमूद सुविधा आदी मिळत नसल्याने गोदामातील हमालांनी संप पुकारला होता. परिणामी वितरण व्यवस्था विस्कळीत झाली होती व दि. २२ डिसेंबरपर्यंत स्वस्त धान्य दुकानदारापर्यंत पोहचते झाले. मात्र अजूनही त्या योजनेतील उणिवा दुर झालेल्या नसल्याने डिसेंबर तर संपला आता पुढचे कसे यावर मार्गदर्शन व उपाय सुचविण्याकरिता स्वस्त भाव दुकानदारांनीच तहसिलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोपवून विचारणा केली आहे. अन्य धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी म्हणून राज्य शासनाने घरपोच योजना अंमलात आणली व त्याचा पहिला प्रयोग भंडारा जिल्ह्यात डिसेंबरमध्ये करण्यात आला परंतु योजनेत वाहनात धान्य चढविणाऱ्या हमालांना हमाली दुकानदाराकडून मिळणे बंद झाल्याने हमाल कामगारांनी संप पुकारुन काम बंद केले होते. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी वेळीच मध्यस्थी करुन हमालीचा प्रश्न हाताळला व हमाल कामगारांना हमाल कंत्राटदाराकडून मिळाणाऱ्या हमालीत वाढ करुन दिली व तृर्तास वितरण व्यवस्थेचा प्रश्न मिटला होता.परंतु त्या हमालांना जास्त हमाली देण्याचे आश्वासन देऊनही अजून पर्यंत त्यांना हमाली मिळालीच नाही.त्यामुळे हमालवर्गात नाराजी पसरली असून परत जानेवारीतही त्यांचे काम बंद होणार असल्याने अन्न-धान्य वितरण व्यवस्था प्रभावित होणार आहे. परत ग्रामीण भागातील जनतेच्या रोषाला दुकानदारांना सामोरे जावे लागणार असल्याने जिल्ह्यातील स्वस्त भाव दुकानदारांनी तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवून स्वस्त भाव दुकानदारांना येणाऱ्या अडचणी जसे धान्याची चालानद्वारे रक्कम भरल्यानंतर धान्य स्वस्त धान्य दुकानात किती दिवसात पोहचेल याची कालमर्यादा निश्चित करणे, गत डिसेंबर महिन्यात गोडावून मधून ट्रॅक्टरमध्ये धान्य मांडून देण्याची हमाली ही हमाल कंत्राटदाराकडून देण्यात आली त्याप्रमाणे दर महिन्याची ही हमाली हमाल कंत्राटदाराने द्यावी, धान्य स्वस्त धान्य दुकानात पोहोचल्यावर धान्य उतरविण्याची आगावू दोन ते तीन रुपये हमाली दुकानदाराकडून होणारी अवैध वसुली, धान्य दुकानात उतरवितांना माल मोजून मिळत नाही.या योजनेच्या पुर्वी दर महिन्याला स्वस्त धान्य दुकानात महिन्याचा ७ तारखेपर्यंत पोहचविण्यात येत असे परंतु योजना सुरु होताच २२ तारखेपर्यंत धान्य दुकानात पोहचले तसेच या योजनेमार्फत आलेल्या प्रत्येक स्वस्त भाव दुकानदाराला प्रत्येक कट्यात १ ते ३ किलो धान्य कमी मिळाला आहे. त्यावर दुकानदारांनी काय करावे व काय करु नये यावर उपाय व मार्गदर्शन करण्यासंबंधीचे निवेदन राष्ट्रीय ग्राहक दिनी तहसिलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले.यावेळी स्वस्त भाव दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कारेमोरे, शालीकराम गौरकर, गुलराजमल कुंदवानी, सुनील मेश्राम, भुपत सार्वे, प्रमोद घरडे व असंख्य स्वस्तधान्य दुकानदार होते. ज्याप्रमाणे रॉकेल वितरण प्रणाली ही घरपोच करण्यात आली त्याच धर्तीवर अन्य धान्य घरपोच का सुरु होवू शकते परंतु या घरपोच योजनेत सुस्पष्टता नसल्याने व अधिकाऱ्यांनीच अर्थाचे अनर्थ काढून योजना क्लिल्ट करित आहे. याचा फटका स्वस्त धान्य दुकानदारानेच का सहन करावा असाही सवाल उपस्थित झाल्याने जानेवारी महिन्यात कधी स्वस्त धान्य ग्रामीण भागात पोहचून वितरीत होणार हे सांगणे जरा कठीणच झाले आहे. परंतु यामुळे ग्रामीण भागातील गरिब जनतेवर उपासमारीची पाळी नक्की येणार एवढे मात्र निश्चित. (शहर प्रतिनिधी)