शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

तूर उत्पादक शेतकऱ्यांची बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2017 12:40 AM

भंडारा धान उत्पादक जिल्हा असला तरी मागील वर्षी तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते.

हमीभाव केंद्राचा अभाव : प्रशासनाने लक्ष देण्याची गरजमुखरु बागडे पालांदूरभंडारा धान उत्पादक जिल्हा असला तरी मागील वर्षी तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतले आहे. मात्र नाफेड अंतर्गत एकही हमीभाव केंद्र नसल्याने येथील शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून बोळवण होत आहे. शेतकऱ्यांच्या अनभिज्ञतेचा फायदा घेत खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा २० ते २५ रुपये कमी मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. शासनाने तूर डाळीला ४६२५ रुपये व ४२५ रुपये बोनस जाहीर केला असतानाही शेतकऱ्याला मात्र त्याचा लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे घराघरात पोहचलेले खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची डाळ खरेदी करताना जुन्याच काट्याने किंवा पायलीने ती खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होत असल्याचे चित्र आता नित्याचे झाले आहे.मागील वर्षी तूर डाळीचे भाव २०० रुपये किलोवर पोहचले होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवनातील तूर डाळ दिशेनासी झाली होती. त्यामुळे नगदी उत्पादन म्हणून यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले. त्यांना निसर्गानेही साथ देत तूर डाळीचे अधिक उत्पादन झाले. तुरीची डाळ विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा केंद्रसरकारच्या नाफेडच्या माध्यमातून जिल्ह्यात धान खरेदी केंद्रासारखे डाळ खरेदी केंद्र नाही त्यामुळे तूर डाळीला हमीभाव दिला असला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यापासून वंचितच राहावे लागत आहे.नाफेड ने जिल्ह्यात हमी भाव केंद्र सुरु करावे अशी मागणी परिसरातील तूर उत्पादकांनी केली आहे. हमीभाव केंद्राअभावी जिल्ह्यातील डाळ खरेदी करणारे खाजगी व्यापारी शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी करीत असले तरी त्यांना योग्य मोबदल्यापासून दूर रहावे लागत आहे. प्रतिकिलो मागे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. प्रशासनाने ही बाब लक्षात घेता. जिल्ह्यात नाफेड अंतर्गत तुर डाळ खरेदी केंद्र सुरु करावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तूर खरेदी नाफेड मार्फत केली जाते. त्यानी जागा मागीतली तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यवस्था केली जाईल. भंडारा जिल्ह्यात नाफेड ही खरेदी यंत्र नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होणे शक्य आहे. - संजय पारोदे, सचिव, कृउबा समिती लाखनीशेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी किमतीने तूर विकू नये, शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तुरीची माहिती बाजार समितीला द्यावी नंतर त्याची माहिती जिल्हाधिकारी यांना देवून हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी करु.- शिवराम गिऱ्हेपुंजे, अध्यक्ष, कृउबा समिती, लाखनी