शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
2
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
3
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
4
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
5
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
6
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
7
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
8
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
9
राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार?
10
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
11
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग
12
Sharad Pawar News सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
13
"विराट कोचला सांगू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही"; ४६ All Out नंतर दिनेश कार्तिकचा दावा
14
Manappuram Finance Shares: RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव, एक्सपर्ट म्हणाले...
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा
16
शोएब अख्तरचा अंदाज ठरला खोटा; इंग्लंड विरुद्ध पाक संघानं विजय मिळवला मोठा
17
Ratan Tata : रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहेत ते?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण
19
“तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत, राहुल गांधींशी चर्चा करणार”: संजय राऊत
20
नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

कोट्यवधी खर्चूनही कालव्याला भगदाड

By admin | Published: August 25, 2016 12:29 AM

पावसाळा असून पाणी नाही, धरण असून पाण्याचे नियोजन नाही. त्यामुळे इटियाडोह व गोसेखुर्द धरणाच्या पाण्याअभावी...

पाण्यासाठी शेतकरी त्रस्त : इटियाडोह धरणाचे कालवे बेवारस, निकृष्ट बांधकामाचे परिणामलाखांदूर : पावसाळा असून पाणी नाही, धरण असून पाण्याचे नियोजन नाही. त्यामुळे इटियाडोह व गोसेखुर्द धरणाच्या पाण्याअभावी हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपिक अखेरची घटीका मोजत असल्याचे भयावह वास्तव बघायला मिळत आहे. लाखांदूर तालुक्याला इटियाडोह धरण व गोसेखुर्द धरणाची मोठी देणं लाभली आहे. चुलबंद व वैनगंगा नदीची भर पुन्हा तालुक्यात हरितक्रांती घडवून आणण्यास मदत मिळणार म्हणून या भागातील शेतकरी आनंदात होता. अत्याधुनिक शेतीच्या तंत्राची जोड व धरणाच्या पाण्याचा वापर यातून आर्थिक प्रगती साधण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न आता भंगणार आहे. इटियाडोह धरण कालव्याच्या दुरुस्तीकरिता नाबार्ड योजनेअंतर्गत करोडोचा निधी खर्च करण्यात आला. यातील अर्धेअधिक कामे पेटी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केले. निकृष्ट कामे झाल्याने आता ठिकठिकाणी भगदाड पडले. सिमेंट अस्तरीकरणाची कामे पाण्यात वाहून गेली. धरणाचे पाणी बंद केल्यावर शेवटच्या टोकावर पाणी पोहचते. त्यामुळे पाण्याअभावी धान पिक धोक्यात आले आहे. इटियाडोह धरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या नियोजनशून्य कारभारामुळे नाले, वाहत आहेत. पाणी वापर संस्था लक्ष देत नसल्याने काही भागातील शेतकरी एक दुसऱ्या कडीला गेट बंद करून पाण्याचा गैरवापर करीत आहेत. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी पाणी वापर संस्थाकडे बोट दाखवून शेतकऱ्यांना हुलकावणी देत आहेत. त्यामुळे धरणात पाणी असून शेतकऱ्यांना पाण्यासाठी बोंबा माराव्या लागत आहेत. अशी परिस्थिती राहिल्यास यावर्षी धान करपल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी) चौरास भागात गोसे धरणाचे कालवे फुटलेचौरास भागात गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचे अनेक ठिकाणी अर्धवट बांधकाम करण्यात आले. मुख्य कालव्याला लागून लहान कालव्याचे बांधकाम झाले नाही. आधीच निकृष्ट दर्जाचे केलेल्या बांधकामाला भेगा पडलेल्या असल्याने धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कालव्याना तडे जाऊन कालवे फुटले. तालुक्यातील मांढळ, ओपारा, गुंजेपार, भागडी, पालपेंढारी, गवराळा, किरमटी, नांदेड, विरली या चौरास भागातील कालवे नामशेष होण्याच्या मार्गावर असून संबंधित विभागाने लक्ष न दिल्यास भविष्यात गोसेखुर्द धरणाचे पाणी चौरास भागात मिळणे कठीण जाणार आहे.