शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

वसंत ऋतूची चाहूल अन् आम्रबहराचा मंदसुगंध

By admin | Published: February 03, 2017 12:39 AM

शिशिरातली वृक्षांच्या पानांची झड थांबली. यातच वसंत ऋतूचे आगमन होत आहे.

चैतन्याची नवपालवी: आम्रवृक्ष लागले बहरायला मोहाडी : शिशिरातली वृक्षांच्या पानांची झड थांबली. यातच वसंत ऋतूचे आगमन होत आहे. वृक्षवेली सौंदर्याने फुलायला लागल्या आहेत. नवपालवी वृक्षांना येणार आहे. सुखद तापमानात आम्रबहराचा मंद सुगंध मोहवून घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.निसर्गसखा वसंत ऋतु आणि निसर्ग सौंदर्य याचा अतूट परस्पर सबंध आहे. संतश्रेष्ठ मुक्तेश्वर म्हणतात, पुष्पधुळीमाजी लोळे वसंत या पक्तीत वसंत ऋतु कसा बहरतो हे सांगितले आहे. सौंदर्याची उधळण करणारा वसंत ऋतुचे आगमन फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. फेब्रुवारी ते एप्रिल महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वसंत ऋतु आपल्या विविधांगी रंगाची उधळण करणार आहे. शिशिर ऋतुतली पतझड थांबली जात आहे. वसंत ऋतुत थंडी कमी होत जाणार आहे. पहाटे थंड वाऱ्याचा मंद झुळका हव्याशा वाटत आहे. वातावरणातील तापमान सुखद वाटत आहे. हळूहळू वातावरणात बदल होणे, बहरणारी फुले, शेत शिवारातली हिरवी पिके मन मोहवून घेत आहेत. पुढच्या मार्च महिना ‘वसंतात्मा’ समजला जातो. रानावनातली पळसवृक्ष बहरुन येतात. पळसबाग लाल आग लागल्यासारखी दिसायला लागतात. यातच आम्रवृक्ष मोहरायला लागला आहे. बारीक फुलांनी आम्रवृक्ष बहरत जात आहे. यात कालावधीत आम्रवृक्ष बहरण्यासोबत कांचन, जांभूळ, करंज, चारोळी, मोह, कोटेसार व शिरीष वृक्ष वसंतात फुलायला आरंभ झालेले आहेत. सोनसावर नावाचा वृक्ष मुख्यत: फेब्रुवारी महिन्यातच फुलतो. महाराष्ट्राचा राज पुष्पतावरण तसेच जारुल, शिवन, अंजन, आपटा, काळापळस, कौशी भोकर असे अनेक वृक्ष वसंतात बहरुन येतात. त्याशिवाय असंख्यवेली व फुलझाडही याच काळात पालावतात अन् सौंदर्यवंत व संताची शोभा वाढवत असतात. फाल्गुणात वसंत रात्री टपोर चांदणे पडतात. या काळात लमंडळीस तरुणांचाही सहभाग होणाऱ्या होळीपर्यंत मंद वाऱ्याची झुळकिते म्हणून जातात. होळीपर्यंत मंद वाऱ्याची झुळकिते म्हणून जातात. होळीपर्यंत मंद चांदण्याचा प्रकाशात खेळाचा सुखद आनंद मिळतो. त्यानंतर ग्रीष्माचा तडाखा सुरु होतो. हा ऋतू भाजून काढतो. मनाला आनंद देणारा व हवाहवाला वाटणारा वसंत ऋतु जीवनात चैतन्याची नवपालवी घेण्यासाठी हळूच येणाची चाहूल देत आहे. सर्वत्र आम्रवृक्ष बहरले आहेत. त्याचा मंद असा सुगंध मनाला आनंद देणार ठरत आहे. क्षणभर आम्रवृक्षाच्या झाडासमीप राहाव व त्या मंद सुगंध मनभर घेत राहाव अस वाटायला लागतो. (तालुका प्रतिनिधी)