शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

जिल्हा कचेरीत प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 10:21 PM

गोसेखुर्द प्रकल्पाच्या जलपातळीत वाढ करण्यात आल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून पीक नष्ट झाले आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा कचेरीतील पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या कक्षात सोमवारी ठिय्या आंदोलन केले. परंतु अधिकाऱ्यांच्या उत्तरावर प्रकल्प ग्रस्त अधिकच संतप्त झाले.

ठळक मुद्देगोसेखुर्द प्रकल्प : पातळी वाढविल्याने शेतात शिरले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाच्या जलपातळीत वाढ करण्यात आल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून पीक नष्ट झाले आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा कचेरीतील पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या कक्षात सोमवारी ठिय्या आंदोलन केले. परंतु अधिकाऱ्यांच्या उत्तरावर प्रकल्प ग्रस्त अधिकच संतप्त झाले.गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुर्णत: पुनर्वसन व्हायचे आहे. असे असतांना या प्रकल्पात २४३.५०० मिटरपर्यंत जलसाठी वाढविण्यात आला. परिणामी अनेक गावांचे मुख्य रस्ते शेतीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली आले.तसेच संपादीत न केलेल्या शेतजमिनीवरील पीकही पाण्याखाली येऊन उध्वस्त झाले आहे. चुकीच्या तांत्रिक सर्व्हेक्षणामुळे झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. याप्रकरणाचा जाब विचारण्यासाठी सोमवारी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन अधिकाऱ्याच्या कक्षात धडकले. त्यांनी याबाबत जाब विचारला असता, उपजिल्हाधिकारी यांनी अपमानास्पद वागणूक केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी करीत ठिय्या आंदोलन सुरु केले.या आंदोलनात प्रहार गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे यशवंत टिचकुले, भाऊ कातोरे, वाल्मीक नागपुरे, रोहित साठवणे, मंगेश वंजारी, रुपेश आथिलकर, गणेश आग्रे, बबलु वाघमारे, वसंता पडोळे, कैलाश अहिरकर, विनोद शेंडे, वासुदेव तुमसरे, चेतन राघोर्ते, विनोद वंजारी, संगित गजभिये, शारदा बन्सोड, लिलाबाई पंधरे, रामप्रसाद ढेंगे, ताराचंद आंबागडे, महादेव आंबागडे, नामदेव खोब्रागडे, वसंता हजारे, राजु कासवकर, प्रकाश उईके, मारोती हासगुडे, प्रभु मेश्राम, यमराज कांबळी, विष्णु मेश्राम, विठ्ठल कांबळे, सचिन ठेकल, आसाराम तलमले, दिपक मोहरकर, वंदना मेश्राम, रामहरिश शेंडे, पंडीत मेश्राम, एजाज अली आदी उपस्थित होते.