शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

राज्य शासनाची मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते विकास योजना कागदोपत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:11 IST

लाखनी तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट : लोकप्रतिनिधी घालावे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क लाखनी : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक मुख्य रस्ते खड्डेमय आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते हे समजणे कठीण झाले आहे. पाणंद रस्त्यांच्या बिकट अवस्थेमुळे शेती विकासाला ब्रेक लागला आहे. जगाच्या पोशिंद्याची यामध्ये परवड होताना पाहायला मिळत आहे. शासनाची पाणंद रस्ते विकास योजना कागदावरच दिसत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे. शेतकरी व नागरिकही त्रस्त आहेत.

केंद्र व राज्य शासनाने नागरिकांसाठी 'शासन आपल्या दारी', 'मेरी मिट्टी मेरा देश' यासारखे बरेच उपक्रम राबविले. या योजनांची उपयोगिता किती हे शासनाला व नागरिकांनाच माहीत आहे.

लोकवर्गणीतून पाणंद रस्त्यांची सुधारणा शेती व्यवसायासाठी महत्त्वाच्या असलेल्या शेत रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, पदरमोड करून आर्थिकदृष्ट्या खालावलेल्या, मात्र मनाची श्रीमंती असलेल्या शेतकऱ्यांना लोकवर्गणीतून पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. तसे प्रयत्नही शेतकऱ्यांकडून होत असल्याचे चित्र लाखनी तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

शेजारील गाव व शेतात जाण्यासाठी अडचणी 

  • रात्री-बेरात्री शेतामध्ये जागलीकरिता, पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. रात्रीला कुणी आजारी पडले तर शेजारच्या मोठ्या गावांत किंवा शहराच्या ठिकाणी उपचारार्थ दवाखान्यात यावे लागते. मात्र, ग्रामीण रस्त्यांसह शेतशिवारातील पाणंद रस्ते आजही दुर्लक्षित आहेत.
  • लाखनी तालुक्यातील पाणंद 3 रस्त्यांच्या दुरवस्थेने शेतीची वाट बिकट झाली आहे. शासनाने पाणंद रस्ते योजनेच्या नावात बदल करीत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना असे नामकरण केले आहे. मात्र, ही योजनादेखील इतर योजनांप्रमाणे कागदावरच राहिल्याने आजही पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला नाही, ही लाखनी तालुक्यासाठी दुर्दैवी बाब मानली जात आहे.
टॅग्स :bhandara-acभंडारा