शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
3
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
4
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
5
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
6
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
7
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
8
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
10
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
11
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
12
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
13
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
14
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
15
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
16
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
18
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
19
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
20
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण

नुकसान लाखोंचे झाले, खात्यात आले मात्र पाच हजार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:56 PM

व्यथा पूरग्रस्तांची: पुनर्वसनाचा तिढाही कायम

विलास खोब्रागडे लोकमत न्यूज नेटवर्क सिल्ली: धरणाचे बॅक वॉटर आणि नदीच्या पुरामुळे जिल्ह्यातील नदीकाठावरील गावे तसेच भंडारा शहरालगतच्या लोक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने लोकांचे लाखोचे नुकसान झाले. मात्र सरकारकडून पूरग्रस्त नागरिकांना केवळ पाच हजारावर बोळवण करण्यात आली. ही मदत म्हणजे पूरग्रस्त नागरिकांची थट्टाच असल्याची लोकांची तीव्र भावना आहे.

जिल्ह्यात ११ व १२ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाने नदी, नाले आणि धरणे तुडुंब भरले. धरणातील पाण्याचे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आले. वैनगंगा नदीची २४५.५० मीटर जलसाठा पातळी ओलांडून भंडारा शहरानजीकच्या गणेशपूर व भोजापूर नाल्यालगतच्या सत्कार नगर, नेहरू वॉर्ड, छत्रपती शाहूनगर, महात्मा फुले कॉलनी इत्यादी लोक वसाहतीला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला. दोन ते तीन दिवस पूर पीडित नागरिकांना बेघर व्हावे लागले. 

नकली पूरग्रस्तांना दुहेरी लाभभंडारा शहारातील पूर प्रभावित क्षेत्रातील काही लोकांना घराचा मोबदला दिला आणि ऐच्छिक पुनर्वसन करून घरे संपादित केली. मात्र लोकांनी मोबदला घेऊनही घरे सोडली नाही. अनेकांनी सरकार जमा झालेल्या घरात भाडेकरू ठेवले. काही लोकांनी पुनर्वसनात सरकारने संपादित केलेल्या घरांची रजिस्ट्री होत नाही, संपादित झालेली बुडीत घरे नोटरी करून परस्पर दुसऱ्यांना विकले. ही बुडीत वस्ती जैसे थे आहे.

पाच हजारावर बोळवण पूर ओसरल्यानंतर १३ सप्टेंबर रोजी पूर पीडितांना सरकारी मदत देण्यासाठी प्रशासनाने पूरग्रस्त भागातील बुडीत घरांचे पंचनामे केले होते. गत आठवड्यात विधानसभेचे बिगुल वाजण्यापूर्वी काही पूर पीडितांच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा झाले. तर काहींच्या खात्यात छदामही आले नाही. त्यामुळे दोन दिवस पुराच्या पाण्यात अन्न, धान्य, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू व सामानासह इतरही लाखों रुपयाचे नुकसान झाले. मात्र सरकारने केवळ पाच हजार नुकसान भरपाई दिली. त्यामुळे ही पूरग्रस्त नागरिकांची थट्टाच असल्याचे नागरिक बोलत आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा