शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

खुवेशचा अपघाती मृत्यू नसून खूनच

By admin | Published: January 04, 2016 12:36 AM

भंडारा-वरठी राज्य महामार्गावर दोन वर्षापूर्वी ६ डिसेंबर २०१३ ला खुवेश रामटेके याचा अपघाती मृत्यू झाला होता.

पालकाचा आरोप : मोबाईल मिळाले नक्षलग्रस्त भागात, पोलीस अधीक्षकांकडे तक्रारवरठी : भंडारा-वरठी राज्य महामार्गावर दोन वर्षापूर्वी ६ डिसेंबर २०१३ ला खुवेश रामटेके याचा अपघाती मृत्यू झाला होता. दरम्यान, अपघातस्थळाहून त्याचे दोन्ही मोबाईल चोरीला गेले होते. याबाबत दाखल तक्रारीनुसार भंडारा पोलीसानी मोबाईल शोधण्यास सुरुवात केली. पण सदर मोबाईल नक्षलग्रस्त चिचगढ भागात आढळल्याने तपास थांबविला होता. अखेर खुवेशच्या पालकांनी चिचगड पोलिसांच्या मदतीने मोबाईल हस्तगत केला. पण भंडारा जिल्ह्यातील मोबाईल नक्षलग्रस्त भागात आढळल्यामुळे खुवेशचा अपघाती मृत्यू नसून खून असल्याची तक्रार पालक मिलिंद रामटेके यांनी पोलीस अधीक्षक भंडारा यांच्याकडे केली आहे.खुवेश घरून जाताना दोन मोबाईल सोबत घेऊन गेला होता. अपघात झाल्यानंतर त्यांच्या काही मित्रांनी त्याचे पाकीट घरच्यांना परत आणून दिले होते. पण त्याच्या जवळ असलेले दोन्ही मोबाईल चोरीला गेले होते. यापैकी एका खासगी कंपनीचा मोबाईल बिल नुसार १० डिसेंबर २०१३ ला पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली होती. अनेक वेळा तक्रार देऊनही मोबाईलचा पत्ता न लागल्यामुळे भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास नुसार सदर मोबाईल नक्षलग्रस्त चिचगड पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गणुटोला येथे आढळला. सदर क्षेत्र नक्षलग्रस्त असल्यामुळे तपास थांबवून स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मोबाईल हस्तगत करण्यात असमर्थता दर्शविली. यानुसार खुवेशचे वडील मिलिंद रामटेके यांनी पत्नी बिंदू रामटेके, सामाजिक कार्यकर्ता त्रिवेणी वासनिक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे व पोलीस मित्र येल्लजवार यांच्यासह चिचगड पोलीस ठाणे गाठले. चिचगड पोलिसांच्या मदतीने नीलेश शाहु व भुवेश अहराज यांचा शोध घेऊन मोबाईल हस्तगत करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी सदर मोबाईल १५० किमी अंतरावर कसा आला याबाबत विणारणा केल्यावर त्यानी उडवाउडवीची उत्तरे दीली. मोबाईलमध्ये ९९२१७४१६६२ या क्रमांकाचे सीम व त्यात असलेले मेमरी कार्ड मिळाले नाही. चिचगड पोलिसांनी मोबाईल हस्तगत केले. पण अपघात संदर्भात पुरेशी चौकशी केली नाही. दोन वर्षात भंडारा पोलिसांना मोबाईल हस्तगत करता आला नाही. उलट नक्षलग्रस्त भाग आहे म्हणून तपास थांबविला. मोबाईल ज्यांच्याकडे होता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. यामुळे खुवेशचा मृत्यू घात-पात असून त्याचा खून करण्यात आला असावा संशय बळावला आहे.खुवेश याचा अपघाती मृत्यू नसून त्याचा खून करण्यात आला असावा असे भंडारा पोलीस अधीक्षक यांना तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात नव्याने तपास करून योग्य ते न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वडील मिलिंद रामटेके यांनी केली आहे. (वार्ताहर)