शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

यंदा शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार !

By admin | Published: June 19, 2016 12:16 AM

आधीच सततच्या दुष्काळ, नापिकी व नैसर्गिक आपत्तीने त्रस्त शेतकरी यंदा तरी दमदार पाऊस येईल, या प्रतीक्षेत आहे.

खत, बियाणांची दरवाढ : मशागत पूर्णत्वावर, पेरणीसाठी शेतकरी सज्ज लाखांदूर : आधीच सततच्या दुष्काळ, नापिकी व नैसर्गिक आपत्तीने त्रस्त शेतकरी यंदा तरी दमदार पाऊस येईल, या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामपूर्व शेती मशागतीची कामे आटोपली असून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे. यंदा, खते, बियाणांची ५० टक्के दरवाढ झाल्याने लागवड खर्चातही वाढ होणार आहे. एकूणच उत्पादन खर्चात दुपटीने वाढ होत असल्याने बळीराजाचे कंबरडे मोडणार आहे.लाखांदूर तालुक्यात धान, सोयाबीन, उस व तुर हे प्रमुख पीक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऊस पिकाचे क्षेत्र कमी होऊन धान पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. पावसाच्या अनियमिततेच्या फटका सलग तीन वर्षे बसल्याने खरिपासह रबीचा हंगाम होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत आला. सरासरीपेक्षाही हेक्टरी उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांना यंदा पीक कजार्वाचून पर्याय नाही. बॅँकादेखील शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. तालुक्यातील काही सेवा सहकारी संस्थांनी मागील ५ ते ६ वर्षापासून नियमित पिक कर्जाची परतफेड न केल्याने यंदा नियमित कर्ज फेडऱ्यांना पीककर्जाकरिता त्रास सहन करावा लागला. याही स्थितीत शेतकऱ्यांनी पदरमोड करून खरीपाची तयारी केली. मृग नक्षत्राचा आठवडा उलटला असला तरी पावसाचा पत्ता नाही. अन दुसरीकडे मशागतीपासून रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशके यांच्या किमतीमध्ये अव्वाच्यासव्वा वाढ झाली आहे. यामुळे लागवडीचा खर्च वाढून शेतकरी जेरीस आला आहे. सध्या शेतकऱ्यांना ३० किलोच्या सोयाबीन बॅगसाठी २,४०० रूपये मोजावे लागत आहे. खताची बॅग मागीलवर्षीच्या तुलनेत किमत दुपटीने वाढली आहे. याशिवाय शेतातील काडीकचरा वेचणे, नांगरण, वखरण, आदी शेतमशागतीच्या कामासाठी एकरी ५ ते ६ हजार रुपये खर्च येत आहे. यंदा तरी वरुणराजाची कृपा व्हावी व शेत हिरवेगार व्हावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. लाखांदूर तालुका भरारी पथकाने हंगामाच्या अगदी सुरूवातीला तालुक्यातील कृषी केंद्राला भेटी देऊन तपासणी केली असता बियाणे, खत, व दस्तावेज व मार्गदर्शनाचे काटेकोरपणे पालन न केल्याच्या कारणावरुन तब्बल १२ कृषी केंद्राला विक्री बंदचे आदेश देण्यात आले. शेतकऱ्यांची फसवणुक होउ देणार नसल्याचे सांगुन यदा कृषी केंद्रावर नजर ठेवण्यात येणार आहे.अशी झाली लागवड खर्चात वाढ दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय, बिनभरवशाचा झाला आहे. शेतीपयोगी साहित्य, खते, बियाणांचे वाढलेले दर यासह अन्य संकटामुळे शेती करणे कठीण झाले आहे. सद्यस्थितीत धानाचा एकरी खर्च १० हजारांवर गेला आहे. शेती तयार कसण्यासाठी काडीकचरा वेचणे ३०० रूपये, नांगरणीकरिता ७०० रूपये, वखरणी ४०० रूपये, बियाण्यांची ३० किलोची बॅग २,४०० रूपये, खताची एक बॅग १,००० रूपये झाली आहे. निंदण, खुरपण, डवरे, काढणी व मळणी यासाठी ५ ते ६ हजार रूपये खर्च येतो. दरवर्षी उत्पादन कमी होत असताना लागवड खर्चात कमालीची वाढ होत आहे.मागीलवर्षी डीएपीचे दर प्रति बॅग १,१७० रूपये होते यंदा १०० रूपयांची वाढ झाली आहे. धान बियाणाच्या कंपन्यानी नाव बदलवुन नवनविन वान तयार केल्याने त्यांच्या किमती पाचपट वाढवुन प्रती किलो १०० ते २०० रूपयाने विक्री सुरू आहे. सोयाबीन बियाणांचे दर १,९०० ते २००० रूपये, प्रती बॅग आता २,४०० रूपयांवर पोहोचली आहे. तूर, मूग, उडदाच्या दरातही १०० ते ३०० रूपये वाढ झाली आहे. दुष्काळी परिस्थितीने संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर दरवाढीचे संकट ओढवले आहे. (तालुका प्रतिनिधी)