शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

धान पिकावर तुडतुडा, करपा

By admin | Published: September 23, 2015 12:50 AM

खरीपाच्या आरंभाला वरूणराजाने उशिरा हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने हलके ...

किडींचा प्रादुर्भाव : पावसाची हजेरी समाधानकारक, अनुदानावर कीटकनाशकांची मागणीपालांदूर : खरीपाच्या आरंभाला वरूणराजाने उशिरा हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने हलके धान अंतिम टप्प्यात असून भारी धान गर्भात आहे. पावसाचे व्यत्यय टळले असून ढगाळ वातावरणाने व उष्णतेने धानावर तुडतुडा, करपा व अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. नियंत्रणाकरीता बळीराजा सरसावला असून महागड्या कीटकनाशकामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. वास्तव परिस्थितीचा अभ्यास पुस्त शासन प्रशासनाने अनुदानावर किटकनाशक उपलब्ध करून देण्याची मागणी कृषि उत्पन्न बाजार समिती लाखनीचे संचालक वसंत शेळके यांनी केली आहे. हातात आलेले धानपिक जाण्याच्या धास्तीने शेतकरी महागड्या किटकनाशकांचा उपयोग करित आहे. मागील वर्षाला पंचायत समिती लाखनी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालय पालांदूर येथे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर औषधी पुरविण्यात आली होती. यामुळे महागाईच्या चक्रातून पुरेसा दिलासा मिळाला होता. मागील वर्षी कोरड्या हवामानामुळे किडीचा प्रादूर्भाव अत्यल्प होता, तरीही अनुदानावर किटकनाशक उपलब्ध झाले. यावर्षाला किडीचा जोरदार प्रहार पिकावर असूनही शासन प्रशासन सकारात्मक धोरण न ठेवल्याने बळीराजा पुरता आर्थिक संकटात आला आहे. पाऊस थांबला व ऊन निघाली तर १५ दिवसात जिल्ह्याच्या काही भागात हलक्या धानाची कापणी व मळणीला आरंभ होऊ शकतो. शेतकऱ्यांनी तात्पुरत्या अडचणी करीता धान व्यापाऱ्याला न विकता थोडसा धीर ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीत किंवा हमीभाव केंद्रावरच विकावे असे आवाहन वसंत शेळके यांनी केले आहे.धान पिकाच्या रक्षणाकरीता व अपेक्षित उत्पन्नाकरिता अळीच्या नियंत्रणाकरीता रासायनिक औषधीत ‘लॅम्बडा, क्लोरो, सायफस क्विनालफॉस’ तर तुळतुळ्याच्या चक्रातून मोकळे होण्याकरीता ‘इमिडा, बुप्रोबेंझीन, अंसाटोप’ यासारखी किटकनाशकांचा वापर सुरू आहे. कृषिमंडळ कार्यालयात जैविक किटकनाशकांचा साठा आला असून त्याचा उपयोग अत्यल्प होत असल्याने शासनाचा निधी कंत्राटदाराच्या घशात गेल्याची चर्चा आहे. यावेळी मागील वर्षीचे किटकनाशक मिळाले असते तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. अधिकाऱ्यांनाही वास्तव कळते पण नाईलाजाने विरोध करता येत नाही. आज कित्येक शेतकऱ्यांच्या घरी जैविक औषधे विना वापराने निरूपयोगी आहेत. या वर्षाला करपा, कडाकरपाने अधिकच जोर धरला आहे. तीन वेळा फवारणी करूनही धानपिक बाधित होत आहे. करप्याच्या नियंत्रणाकरीता शेतकरी बुरशीनाक फवारणी करित असल्याचे दृश्य जिल्हाभर दिसतआहे. (वार्ताहर)