शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
4
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
5
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
6
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
7
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
8
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
9
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
10
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
11
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
12
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
13
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
14
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
15
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
16
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
17
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
18
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
19
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
20
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

धान साठविण्यासाठी शाळा समाज मंदिराचा उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:26 AM

भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात ३७ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. त्यातील अर्धा अधिक धान उघड्यावर होता. सध्या ...

भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात ३७ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. त्यातील अर्धा अधिक धान उघड्यावर होता. सध्या ही १० लाख क्विंटल धान उघड्यावर आहे. अशा स्थितीत रबी हंगामातील धान खरेदी सुरू झाली. परंतु गोदाम नसल्याने हा धान कुठे ठेवावा, असा प्रश्न आहे. परिणामी खरेदी ठप्प झाली आहे. यावर पर्याय म्हणून कोरोना संकटात बंद असलेल्या शाळा आणि गावा गावातील समाज मंदिरांचा उपयोग धान साठविण्यासाठी करावा, अशी सूचना आपण जिल्हा प्रशासनाला केल्याचे सांगितले. रबी धानाची मुदत वाढही आपण मिळवून दिल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

कोरोना संकटामुळे मत्स्य व्यवसाय करणारे बांधव संकटात आले आहे. आता त्यांना या संकटात मदत म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत येणारे तलाव मत्स्य व्यवसायासाठी सहकारी संस्थांना लीजवर दिले होते. त्याची लीज वाढवून देण्यात आली असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही याबाबत जिल्हा परिषदेने एक आदेशही निर्गमीत केला आहे. ओबीसीचे अधिकार आबाधित रहावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, प्रेमसागर गणवीर, अतुल लोंढे, हिरालाल नागपुरे, राजेश हटवार उपस्थित होते.भंडारा : रबी हंगामातील खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी गोदामांची पुरेशी सुविधा नसल्याने कोरोना संकटामुळे बंद असलेल्या शाळा आणि समाज मंदिराचा उपयोग धान साठविण्यासाठी करावा, अशी सूचना आपण प्रशानाला दिली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.

भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात ३७ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. त्यातील अर्धा अधिक धान उघड्यावर होता. सध्या ही १० लाख क्विंटल धान उघड्यावर आहे. अशा स्थितीत रबी हंगामातील धान खरेदी सुरू झाली. परंतु गोदाम नसल्याने हा धान कुठे ठेवावा, असा प्रश्न आहे. परिणामी खरेदी ठप्प झाली आहे. यावर पर्याय म्हणून कोरोना संकटात बंद असलेल्या शाळा आणि गावा गावातील समाज मंदिरांचा उपयोग धान साठविण्यासाठी करावा, अशी सूचना आपण जिल्हा प्रशासनाला केल्याचे सांगितले. रबी धानाची मुदत वाढही आपण मिळवून दिल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

कोरोना संकटामुळे मत्स्य व्यवसाय करणारे बांधव संकटात आले आहे. आता त्यांना या संकटात मदत म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत येणारे तलाव मत्स्य व्यवसायासाठी सहकारी संस्थांना लीजवर दिले होते. त्याची लीज वाढवून देण्यात आली असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही याबाबत जिल्हा परिषदेने एक आदेशही निर्गमीत केला आहे. ओबीसीचे अधिकार आबाधित रहावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, प्रेमसागर गणवीर, अतुल लोंढे, हिरालाल नागपुरे, राजेश हटवार उपस्थित होते.

बॉक्स

कितीही विरोध केला तरी जम्बो कोविड सेंटर होणारच

भंडारा जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडाला होता. अनेकांना कोरोनाची बाधा झाली. काहींचा बळी गेला. हीच परिस्थिती पुन्हा उदभवून नये. सर्वसामान्यांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी वरठी येथे जम्बो कोविड सेंटर उभारले जात आहे. ५०० ऑक्सिजन खाटांची सुविधा असलेल्या या कोविड सेंटरला काहींचा विरोध आहे. मात्र पैसा कितीही लागला तरी चालेल. सामान्यांचा जीव वाचला पाहिजेच. म्हणूनच कोणी कितीही विरोेध केला तरी कोविड सेंटर उभारणारच, असे नाना पटोले म्हणाले. जिल्हा रुग्णालयात ३५० मॅट्रिक टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लॉट तालुका ठिकाणी उभारले जात आहे. याचा फायदा सर्वसामान्य जनतेलाच होणार आहे.