शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

तुमसरात पाण्यासाठी हाहाकार

By admin | Published: June 22, 2016 12:28 AM

जिवनदायनी वैनगंगेचे पाणी आटल्याने तुमसर शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या मोटार पंपात रेती शिरली व तांत्रीक बिघाड झाला त्यामुळे नळांना पाणी आलेच नाही.

श्रीरामनगरातील बोअरवेल बंद : तुमसरकरांना सोडले वाऱ्यावर, नगरसेवकांचा आरोपतुमसर : जिवनदायनी वैनगंगेचे पाणी आटल्याने तुमसर शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या मोटार पंपात रेती शिरली व तांत्रीक बिघाड झाला त्यामुळे नळांना पाणी आलेच नाही. तर दुसरीकडे संपुर्ण शहराला पाणी पुरवठा करणारी श्रीराम नगरातील बोअरवेलच्या पंपात बिघाड आला. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा होवू शकत नसल्यामुळे तुमसरात पिण्याच्या पाण्यासाठी गत दोन दिवसापासून हाहाकार माजला. असतांना मुख्याधिकाऱ्यानि मात्र कार्यालयातून लापता राहून तुमसरकरांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप संतप्त नगरसेवकांनी केला आहे. पावसाने दगा दिल्याने तालुक्यातील सर्व तलाव, विहिरीने तळ गाढले. साधारणत: मार्च महिण्यापासून उन्हाळ्याला सुरुवात होत असते. मात्र तुमसर तालुक्यात डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची चणचण भासणे सुरु झाली. मात्र जिवनदायनी वैनगंगेने तुमसरकरांना ती चणचण भासू दिली नव्हती. परंतू जसजसी उष्णता वाढू लागली तसतसी वैनगंगाही आटू लागताच न.प. ने पाण्याचे स्त्रोत बदलविले व पाणी पुरवठा केला. दरम्यान तुमसरातील नगरसेवकांनीही पाण्याचा धर्म पाळत. शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये. म्हणून टँकरची व्यवस्था करुन श्रीराम नगरातील बोअरवेल पाणी शहरात वाटप केले. निवडणुकीचा अपवाद वगळता नगरसेवक मौलाचे कार्य करीत होते. त्यामुळे मुख्याधिकारी हे बेफिर होवून वावरत होते. त्यामुळे कार्यालयात दोन दोन तिन तिन दिवस गैरहजर राहणे हे त्यांच्या नित्याचे झाले. एकीकडे नागरिकांकडून पाणी पट्टी कराच्या नावावर कडक मोहीम राबवून जबरान कर वसूली करण्यात आली पंरतु न.प. प्रशासनाची शहरात एकही कर वसूली पथक फिरकले नाही. खुद नगरसेवकांनी पुढाकार धेवून व पैसे खर्च करुन पाणी वाटप करित असतांना मुख्याधिकाऱ्यांचा बेफिकीरपणा नगर सेवकांना पवनी व पडल्याने नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच रोष दर्शविला होता व पुढे येणाऱ्या अडचणीही सांगितल्या होत्या. परंतू मुख्याधिकारी गुल्हाणे यांनी कानाडोळा केला व आजघडीला तुमसर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगेचे पात्र आटले व मोटारपंपात रेती शिरल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. तर दुसरीकडे ज्या बोअरवेल मधील पाणी टँकरमध्ये भरला जायचा तिचीही मोटार बंद पडल्याने टँकरनेही पाणी पुरवठा बंद झाला आहे. असे असताना मुख्याधिकारी लापता आहेत. त्यावरुन मुख्याधिकारी किती कर्तव्यदक्ष आहेत हे दिसून आले. आहे. असा आरोप पक्षनेता प्रमोद तितीरमारेनी पिण्याच्या पाण्याची समस्या ही जर वेळीच निकाली निघाली नाही तर तुमसर न.प. वर काँग्रेसच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला. याबाबत मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांची प्रतिक्रिया घेण्याबाबत दुरध्वनी केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. (शहर प्रतिनिधी)