शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

कोट्यवधींचा खर्च सिंचनासाठी व्यर्थ

By admin | Published: February 08, 2016 12:34 AM

गत ३० वर्षापासून तालुक्यातील शेतीला हिरवेगार करण्यासाठी नेतेमंडळी सिंचन प्रकल्पासाठी निधी आणल्याचा आव आणत आहेत.

रबी हंगामात अडचण : साकोली तालुक्यातील व्यथासाकोली : गत ३० वर्षापासून तालुक्यातील शेतीला हिरवेगार करण्यासाठी नेतेमंडळी सिंचन प्रकल्पासाठी निधी आणल्याचा आव आणत आहेत. आतापर्यंत निम्म चूलबंद प्रकल्पाचे काम जवळपास पुर्णत्वास आले असले तरी ते व्यर्थ ठरत आहे. रबी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. या प्रकल्पाला अजून किती दिवस लागतील, या प्रतीक्षेमुळे शेतकऱ्यांना पुन्हा विहिरी, बोड्या व तलावाकडेच वळावे लागत आहे.गत २० वर्षापासून तालुक्यातील कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम सुरु आहे. मात्र अजूनही या प्रकल्पाचे काम अपुर्ण आहे. बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याच्या शेतीचा मोबदला मिळालाच नाही. प्रकल्पाच्या पंपहाऊसचे कामासह इतर काम अपूर्ण आहे. या प्रकल्पावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला असला तरी हे काम अद्यापही रखडलेले आहे. या प्रकल्पाची पाहणी तत्कालीन सिंचनमंत्री यांनी केली. मात्र हा प्रकल्प तालुकावासीयांसाठी पांढरा हत्तीच ठरला आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.तालुक्यातील दुसरा महत्वाचा प्रकल्प भिमलकसा याची वनकायद्यातून तब्बल ३० वर्षानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सुटका केली. यानंतर या प्रकल्पासाठी राजकीय वर्तुळातून मोठ्या हालचाली झाल्या. प्रकल्पाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली मात्र केंद्राच्या अंतिम मंजुरीसाठी हा प्रकल्प अडला आहे. याही प्रकल्पाचे ९० टक्के काम पुर्ण झाले असुन प्रकल्पावर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. तर तालुक्यातील तिसरा महत्वपूर्ण प्रकल्प घानोड येथील भुरेजंगी प्रकल्प सद्यास्थितीला या प्रकल्पाकडे एकाही लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही हे मात्र विशेष. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांचे लक्षसाकोली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा दोन्ही सिंचनप्रकल्पाकडे पल्लवित झाला होत्या. शेतकऱ्यांना हरीत क्रांतीची अपेक्षा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमेल तसे शेतीतुन उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आज अशी परिस्थिती आहे की खरीप पिकानंतर शेती पुर्णत: खाली पडली असून पाण्याअभावी शेतकरी रब्बी पिक घेऊच शकत नाही अशी विदारक अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यावधीचा खर्च सिंचनासाठी व्यर्थ असेच म्हणण्याची वेळ आली आहे.