शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
2
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
3
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
4
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
5
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
6
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
7
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
8
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
9
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
10
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
11
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
12
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
13
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
14
Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
15
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू
16
अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट
17
Arjun Tendulkar Video: Video: अर्जुन तेंडुलकरचा धमाका! ९ विकेट्स घेत फिरवला 'गेम'; संघाला मिळवून दिला विजय
18
एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण
19
महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला
20
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...

आंब्याची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Published: May 27, 2015 12:37 AM

वाढत्या शहरीकरणासोबत ग्रामीण भागातील आम्रवृक्षाची कटाई मोठ्या प्रमाणावर होत आहे.

अधिकाऱ्यांचे अभय : पर्यावरणाचे संतुलन बिघडलेमोहाडी : वाढत्या शहरीकरणासोबत ग्रामीण भागातील आम्रवृक्षाची कटाई मोठ्या प्रमाणावर होत आहे. यातून गावागावातील अमराई नष्ट होत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे. त्यामुळे आम्रवृक्ष तोडीवर त्वरित प्रतिबंध घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.उन्हाळ्यात आंब्याना महत्व आहे. ऊन लागले असेल, शरीरात उष्णता वाढली असेल तर आंबा अतिशय गुणकारी ठरतो. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. आंब्याचा रस व गव्हाच्या शेवया या तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा पसंतीचा आहार असतो. ग्रामीण भागात आंब्याचा रसासोबत शेवया खाण्याची पध्दत आहे. आंब्याचे लोणचे तार आलेल्या रुग्णाच्या तोंडाला चव येण्यासाठी देतात. एकूणच आंबा दैनंदिन आयुष्यात महत्वाचा घटक आहे. आंब्याचे झाड इतर झाडांपेक्षा उंच व विस्ताराने मोठे असते. उन्हात प्रवास करणाऱ्या वाटसरुंना उन्हाचे चटके कमी करण्यासाठी आंब्याच्या सावलीचा मोठा उपयोग होतो. आंब्याचे झाड उंच असल्याने पावसाळ्यात भिजण्यापासून वाचविण्यासाठी याचा फायदा होतो. हवेने, वादळाने हे झाड पडले तर त्याच्या लाकडाचा सरपणासाठी वापर केला जातो. सद्यस्थितीत काही दलालही आंब्याची झाडे घेत ओहत. शेतकऱ्यांना जादा पैशाचे आमिष दाखवून आंब्याचे वृक्ष मुळापासून तोडून नष्ट करीत आहे. शासन गाव तिथे रस्ता, रस्ता तिथे झाडे लावण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे व निसर्गाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु महसूल विभागच दलालांना आंब्याचे झाडे तोडण्यासाठी परवानगी देत आहे.पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्वाचा असलेला फळाचा राजा आंब्याची होत असलेले कत्तल थांबवून तोंडणाऱ्यावर व तोडण्याची परवानगी देणाऱ्या विभागावर कारवाई का होऊ नये असा जनतेचा सवाल आहे. (तालुका प्रतिनिधी)