शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

भंडारा जिल्हा परिषद : जनतेचा कौल काॅंग्रेसला; पण राष्ट्रवादी कुणासोबत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 11:49 IST

भंडारा जिल्हा परिषदेत बहुमताचा जादूई आकडा जवळ करण्यास काॅंग्रेस केवळ सहा ‘हात’ दूर आहे. दुसरीकडे तेथे चार अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. त्यामुळे ते साेबत आल्यास २५ पर्यंत संख्याबळ हाेऊ शकते.

ठळक मुद्देसत्तास्थापनेच्या हालचाली पडद्याआड सुरू

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा : मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसले तरी २१ जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून भंडारा जिल्हा परिषदेत पोहोचला. कुणालाही दुसऱ्या पक्षाच्या कुबड्या घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. जनतेचा कौल काँग्रेसला असला तरी राष्ट्रवादी कुणासोबत जाणार, हा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेत सर्वाधिक २१ जागा जिंकत काँग्रेस मोठा पक्ष ठरला. राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना एक, बसप एक आणि अपक्षांनी चार जागांवर विजय मिळविला. सत्ता स्थापनेसाठी २७ सदस्यांची आवश्यकता आहे; परंतु हे संख्याबळ कुणाकडेही नाही. काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष असल्याने सर्वांनी आमच्यासोबत यावे, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र, निवडणुकीत स्वतंत्र लढलेला राष्ट्रवादी पक्ष काय भूमिका घेतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली तर सहज सत्ता स्थापन होऊ शकते. मात्र, तेवढे सहज सोपे नाही. काँग्रेस ‘एकला चलोरे’ या भूमिकेच्या तयारीत आहे. चार अपक्ष, बसप आणि शिवसेनेचा एक सदस्य घेऊन बहुमत काँग्रेसला गाठता येते तर दुसरीकडे काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपही स्थानिक पातळीवर एकत्र येऊ शकते. त्यांच्याकडे चार अपक्ष आले तर त्यांनाही बहुमत मिळविता येते. मात्र, वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो आणि कोण कुणासोबत जातो, हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व समीकरणात राष्ट्रवादी मात्र महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

अपक्षांच्या मनात येईल तर...

भंडारा जिल्हा परिषदेत बहुमताचा जादूई आकडा जवळ करण्यास काॅंग्रेस केवळ सहा ‘हात’ दूर आहे. दुसरीकडे तेथे चार अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. त्यामुळे ते साेबत आल्यास २५ पर्यंत संख्याबळ हाेऊ शकते. शिवसेना आणि बसपला साेबत घेतल्यास २७ हा जादूई आकडा पार हाेऊ शकताे. मात्र ‘जर-तर’ आणि ‘अध्यक्षपद’ यासाठी अपक्ष अडून बसल्यास नवल वाटू नये, तशी चर्चाही आता सुरू झाली आहे.

पटेल-पटोले यांचे सूत जुळणार काय?

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची चावी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हाती आहेत. मात्र, अलीकडे या दोन नेत्यांची फारशी जवळीक दिसत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी हे दोन नेते एकत्रित येणार की नाही, याचीही उत्कंठा जिल्ह्याला लागली आहे.

आमचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. काँग्रेसची काय भूमिका आहे ते कळले नाही. त्यांच्या भूमिकेनंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

- नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी.

जिल्हा परिषदेत आम्ही मोठा पक्ष आहो. त्यामुळे कुणालाही आमच्या सोबतच यावे लागेल. मात्र, पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्याप्रमाणे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जातील.

- मोहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष काँग्रेस.

टॅग्स :zpजिल्हा परिषदPoliticsराजकारण