शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

मागील दुष्काळाची पुनरावृत्ती होईल का?

By admin | Published: August 22, 2016 12:26 AM

कधी अस्मानी तर कधी सुलतानी निसर्गाच्या या अवकृपेमुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकरी हवालदिल : नैराश्याच्या गर्तेत शेतकरीविलास बन्सोड उसर्राकधी अस्मानी तर कधी सुलतानी निसर्गाच्या या अवकृपेमुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील सतत दोन वर्षापासून दुष्काळाचे चक्र सुरु आहे. तेव्हा यंदाही मागील दुष्काळाची पुनरावृत्ती होईल का? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.सुरुवातीला वरुन राजाच्या उशिरा झालेल्या आगमनाने शेतकरी चिंतातूर होता. चातक पक्षाप्रमाणे शेतकरी पावसाची वाट पाहत होता. अखेर मेघ बरसले व शेतकरी कामाला लागला. अशातच जास्त पाणी आल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे कुजून नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यानंतर मुख्य रोवणी झाल्यानंतर काही दिवसातच धान पिकाला लष्करी अळीमुळे धानपिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. उसर्रा परिसरातील उसर्रा, सालई (खुर्द), टाकला, बपेरा (आंबागड), टांगा, सालई (बुज), धोप, ताडगाव, सिहरी आदी भागात तर लष्करी अळीनी शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. यातच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांचे मन समाधान करुन काही उपाययोजना सुचविल्या, पण निसर्गाच्या या अवकृपेमुळे मात्र पूर्णत: आर्थिक संकटात सापडला आहे.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांनी कुणी सेवा सहकारी सोसायटी मधून, कुणी सहकारी पतसंस्थेकडून तर कुणी सोने गहाण करुन एवढेच नव्हे तर कुणी अ‍ैवध सावकारी व्यक्तीकडून कर्ज काढून शेती लागवड केली. पण यंदाही शेतकऱ्यांच्या हाती भातपिके भेटतात की नाही, अशी बिकट अवस्था सध्या शेतकऱ्यांना सर्व दूर दिसत आहे. शेतकरी संपूर्णत: नैराशेच्या गर्तेत सापडला असून मागील दोन वर्षापासून असलेले कर्ज कसे फेडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या शेतावर असलेले लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी आपल्या शेतीकडे पाठ फिरवत असतानाचे चित्र सर्वदूर दिसत आहे. शेती आतापासूनच कोरडी व्हायला लागली आहे.धान पिकासाठी पेंचचे पाणी सोडाभंडारा : पेंच प्रकल्पाचे पाणी धानाला सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परीषद सदस्य प्यारेलाल वाघमारे यांनी नागपूर विभागाचे पाटबंधारे व्यवस्थापन कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शेतकऱ्यांना धानासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी भंडारा सर्कलला सोडण्यात यावे, शेतकऱ्यांच्या निंदनासाठी तसेच लष्करी अळी धानावर लागल्यामुळे औषधी फवारणीकरीता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. काही प्रमाणात धानाची रोवणी अडकलेली आहेत. त्याकरीता पेंच प्रकल्पाचे पाणी त्वरीत सोडण्यात यावे, यामध्ये हत्तीडोई, मोहदुरा, जाख, गुंजेपार, नवेगाव, टवेपार, खुर्शीपार, पांढराबोडी, भोजापूर, केसलवाडा, शुक्रवारी तसेच सोनुली, दाभा, जमनी या गावातील शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे,अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्यारेलाल वाघमारे यांनी निवेदनातून दिला आहे.लष्करी अळीचा प्रादुर्भाव असून यावर कृषी विभागाकडून उपाययोजना व शेतकऱ्यांना भेटून सल्ला देण्याचे काम सुरु आहे. पंजाबराव कृषि विद्यापिठ यांनी सुचविलेल्या प्रमाणे डायक्लोरीवास औषघीची मागणी केली आहे.- किशोर पात्रीकर, तालुका कृषी अधिकारी मोहाडी