शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

जिल्हा परिषद विश्रामगृह झाले इतिहासजमा

By admin | Published: August 02, 2015 12:48 AM

स्थानिक गांधी चौकात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे विश्रामगृह अत्यंत दयनिय स्थितीत उभे आहे.

शोभेची ब्रिटिशकालीन वास्तू : गतकालीन वैभव प्राप्त होण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज, नव्याने बांधणी करणे गरजेचेअशोक पारधी पवनीस्थानिक गांधी चौकात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे विश्रामगृह अत्यंत दयनिय स्थितीत उभे आहे. इमारत विश्राम गृहाची असली तरी ते विश्रामगृह सद्यस्थितीत इतिहासजमा झालेले आहे. पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय कार्यालय तेथे स्थानांतरीत करण्यात आलेले आहे.गेल्या ३५ वर्षांपूर्वी पवनी तालुक्याचे ठिकाण नव्हते त्यावेळी जिल्हा परिषद विश्रामगृह 'सराम' या नावाने प्रसिद्ध होते. त्यावेळी लोकांची गाऱ्हाणी ऐकूण घेण्यासाठी जिल्हास्तरावरून अधिकारी महिन्याकाठी 'सराय'मध्ये येवून बसत होते. ग्रामीण जनतेच्या समस्या ऐकल्या जात होत्या. विश्रामभवनाच्या वऱ्हांड्यात त्यावेळी लोकांची वर्दळ असायची. काळात बदल झाला. अधिकारी सभांमध्ये व्यस्त झाले. पवनी तालुक्याचे ठिकाण झाले. लोकांना फारस्या समस्या उरल्या नाहीत. त्यामुळे सरायची गरज संपली. त्याचे विश्रामगृहात रूपांतर झाले. अलिकडे विश्रामगृहाची सुद्धा गरज ठरली नसावी. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. विश्रामगृह डागडुजी करून वापरण्यायोग्य राहीले नाही. त्याची नव्याने बांधणी करणे गरजेचे आहे. चार-पाच वर्षापुर्वी विश्रामगृह निर्लेखित करून नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने पारित केल्याचे ऐकिवात आहे. परंतु अंमलबजावणी झालेली नाही.विश्रामगृहाची पुन:बांधणी करायची म्हणजे बांधकामाचे मंजूरीपासून सर्व सोपस्कार करावे लागणार आहेत. पवनी शहरातील ऐतिहासिक गेटपासून ३०० मीटरपर्यंत बांधकामासाठी पुरातत्व विभाग परवानगी देत नाही. विश्रामगृह अवघ्या ५० मीटरच्या आंत आहे म्हणजे शासकीय बांधकामांनासुद्धा पुरातत्व विभागाची परवानगी मिळणार नाही आणि जिल्हा परिषदेने तरतुद जरी केली तरी सहजरित्या बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे दोन सुट असलेले ब्रिटीशकालीन विश्रामगृह अखेर इतिहासजमा झाले, असे मानल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.विश्रामगृहाचे भवितव्य राजकारणातील सक्तींच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. ठोस पावले उचलली तर विश्रामगृहाला गतकालीन वैभव प्राप्त होण्यास विलंब लागणार नाही हे मात्र खरे आहे.