शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

२७ दिवसांत १0 शेतकरी आत्महत्या

By admin | Published: August 28, 2015 12:21 AM

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच ; आठ महिन्यांत १0५ आत्महत्या.

बुलडाणा : शेतकरी आत्महत्येचे सत्र बुलडाणा जिल्ह्यात सुरूचआहे. गत आठ महिन्यात जिल्ह्यात १0५ शे तकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली असून, ऑगस्ट महिन्याच्या २७ दिवसांत १0 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याने समाजमन ढवळून निघाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मागील दहा वर्षांमध्ये १६२0 शेतकरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या आ त्महत्याप्रकरणी प्रशासनाने केवळ ६२५ प्रकरणांमध्ये मदत दिली असून, ९६९ प्रकरणे नामंजूर केली. दुर्दैवाची बाब म्हणजे, पात्र प्रकरणांपेक्षा अपात्र प्रकरणांचाच आकडा जास्त असल्यामुळे मरणानंतरही या शेतकर्‍यांना न्याय मिळू शकला नाही. जिल्ह्यात सन १ जानेवारी ते २७ ऑगस्ट दरम्यान, नापिकी व कर्जबाजारी झालेल्या १0५ शेतकर्‍यांनी आ त्महत्या केल्याची शासनदप्तरी नोंद आहे. शासकीय मदतीसाठी पात्र ठरणार्‍या प्रकरणांमध्ये आत्महत्येची कारणे शोधली असता, कर्ज आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचेच प्रमाण सर्वाधिक आहे. तरीही शासनाने केवळ ३५ प्रकरणेच प्रशासनाने पात्र ठरविली, तर १९ आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. ५१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. यावर्षी सुरुवातीला अवकाळी पावसाने जिल्ह्यात िपकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरू असून, २५, २६ आणि २७ ऑगस्ट या तीन दिवसांत पाच शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली. *यावर्षी १९ प्रकरणे ठरविली अपात्र शेतकरी आत्महत्येचे सत्र सन २00५ पासून सुरू झाले. यादरम्यान १६२0 शेतकरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. प्रशासनाने केवळ ६२५ प्रकरणांमध्ये मदत दिली असून, ९६९ प्रकरणे नामंजूर केली आहेत. जानेवारी ते ऑगस्ट २0१५ या काळात जिल्ह्यात १0५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. यापैकी शासनाने विविध निकष लावून १९ प्रकरणे अपात्र ठरविली. यात आजारपणामुळे दोन, व्यसनाधीनता सहा, अपघात दोन, बेरोजगारी एक आणि घरगुती भांडणातून नऊ शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे शासकीय अहवालात नमूद केले आहे.