शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

१३ लाख नागरिक साथरोगाने बाधित

By admin | Published: May 12, 2017 8:02 AM

साथरोग नियंत्रण कार्यक्रम ; ४३ नागरिकांचा मृत्यू.

नीलेश शहाकार बुलडाणा : गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, काविळ आणि विषमज्वरसारख्या साथरोगाची राज्यात गतवर्षभरात १२ लाख ९६ हजार लोकांना लागन झाली, तर उपचाराअभावी ४३ नागरिकांचा मृत्यू झाला, त्यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेला साथरोग नियंत्रण कार्यक्रम अयशस्वी होत असल्याचे चित्र आहे.मान्सूनपूर्व कालावधीत साथरोग उद्भवल्यास यावरती तत्काळ नियंत्रण आणण्यासाठी तसेच पावसाळा कालावधीत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याकरिता उपाययोजना करण्यात येते. आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा परिषद, नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे नियोजन राबविण्यात येते.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येते. प्रत्येक नियंत्रण कक्षात कर्मचारी नियुक्त करण्यात येऊन या कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांवर लक्ष ठेवले जाते.सर्व स्थानिक प्रशासनाने पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता करावी. पाणीपुरवठा स्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवाण्यासंदर्भात सूचना देण्यात येते. पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिनयुक्त टीसीएल पावडरचा पुरवठा करण्यात येतो; मात्र इतर आरोग्य कार्यक्रमाप्रमाणे साथरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही किंवा आरोग्य कर्मचारी पदनिर्मिती नाही. या कार्यक्रमात जिल्हा आरोग्य विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, कीटकजन्य आजार आणि हिवताप विभागातील कर्मचारी काम करतात. त्यामुळे कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे कार्यक्रम अयशस्वी होत असल्याचे चित्र आहे.