शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

पीककर्जाचे १५०० कोटींचे उदिष्ट, केवळ २४४ कोटींचे वितरण

By विवेक चांदुरकर | Updated: June 3, 2024 14:21 IST

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : जून महिन्याला प्रारंभ झाला असून पाऊस पडल्यानंतर पेरणीला प्रारंभ होणार आहे. पीककर्ज वाटपात बॅंकांची ...

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : जून महिन्याला प्रारंभ झाला असून पाऊस पडल्यानंतर पेरणीला प्रारंभ होणार आहे. पीककर्ज वाटपात बॅंकांची गती अत्यंत धीमी असून, शेतकर्यांना विविध कागदपत्रे गोळा करण्याकरिता बॅंकांच्यावतीने त्रास देण्यात येत आहे. जिल्ह्यात पीककर्जाचे १५०० कोटींचे उदिष्ट, केवळ २४४ कोटींचे वितरण करण्यात आले आहे.

खरीप हंगामात पेरणी करण्याकरिता दरवर्षी बॅंकांच्यावतीने शेतकर्यांना एका वर्षाकरिता बिनव्याजी पीककर्ज देण्यात येते. पूर्वी शेतकरी सावकारांकडून कर्ज घेत होते. यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. बॅंकाकडून बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेतकर्यांना बराच लाभ मिळाला आहे. मुदतीच्या आत शेतकर्यांनी जुने कर्ज भरल्यावर नवीन कर्ज देण्यात येते. यावर्षी बुलढाणा जिल्ह्याला १५०० कोटींचे उदिष्ट देण्यात आले आहे. जून महिन्याच्या २ तारखेपर्यंत जिल्ह्यात २४४ कोटींचे वाटप करण्यात आले. यात यावर्षी पीक कर्ज वाटपाची गती नगण्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण करून केंद्र आणि राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा. ३० जून पूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण केल्यास तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के व्याज लागते. तसेच १० टक्के वाढीव कर्ज मिळत असल्याने या योजनेचा लाभ घ्यावा, पीक कर्ज नुतनीकरणामुळे खरीप पिकासाठी लागणाऱ्या खर्चास मदत होते. पीक कर्जाचे नूतनीकरण शेतकऱ्यांना फायद्याचे असल्याने शेतकऱ्यांनी पीक कर्ज नूतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.कागदपत्रांसाठी अधिकार्यांकडून त्रास

काही बॅंकांच्यावतीने शेतकर्यांना अनावश्यक कागदपत्रे मागवण्यात येतात. त्याकरिता शेतकर्यांना बरेच पैसेही खर्च करावे लागते. तसेच काही बॅंकांच्यावतीने विनाकारण पीककर्ज देण्यास विलंब करण्यात येत असल्याची तक्रार शेतकर्यांनी केली आहे. जिल्हाधिकार्यांनी अशा बॅंकाच्या अधिकारी, कर्मचार्यावर कारवाइ करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.ही कागदपत्रे आवश्यक

पीक कर्जाच्या नुतनीकरणासाठी प्रत्येक बँक शाखेमध्ये विशेष खिडकी उघडण्यात आली आहे. नुतनीकरणासाठी सात बारा, आठ अ, आधार कार्ड, रेव्हेन्यू स्टॅम्प आदी कागदपत्रे सादर करावी लागतात.

खरीप हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पिक कर्जाचे अत्यल्प वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्याने कर्ज मिळविण्यासाठी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे. - डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र