शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

उपवासाची भगर खाल्ल्याने २० जणांना विषबाधा; चिखली तालुक्यातील सहा, तर जाफ्राबादमधील दोन जणांचा समावेश

By ब्रह्मानंद जाधव | Published: September 22, 2022 5:54 PM

चिखली तालुक्यातील सहा, तर जाफ्राबादमधील दोन गावातील रूग्णांचा समावेश

चिखली : एकादशीच्या उपवासाला भगर खाल्ल्याने चिखली तालुक्यातील सहा, तर शेजारील जफ्राबाद तालुक्यातील दोन गावातील २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार २२ सप्टेंबरच्या समोर आला. विविध गावातील या रूग्णांवर येथील चार खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, ऐन नवरोत्रोत्सवाच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

बुधवार २१ सप्टेंबर रोजी एकादशी होती. तालुक्यातील पेठ, आमखेड, गोद्री, साकेगाव, भालगाव, सिंदी हराळी या सहा गावांसह जाफ्राबाद तालुक्यातील वरूड व कोळगाव येथील भाविकांनी फराळासाठी आपल्या गावातील विविध किराणा दुकानांतून भगर व भगरीच्या पिठाची खरेदी केली होती. दरम्यान, या भगरीचा फराळ खाल्ल्यानंतर अनेकांना मळमळ, उलटी, जुलाब, डोकेदुखी व घबराट आदी त्रास जाणवू लागला. काहींनी अॅसीडीटी असेल म्हणून सुरूवातीला दूर्लक्ष केले. मात्र, त्रास वाढल्याने नातेवाईकांची चांगलीच धांधल उडाली. नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने त्रास होणाऱ्यांना चिखलीतील विविध खासगी रूग्णालयात दाखल केले.

शहरातील विविध रूग्णालयात उपचारार्थ दाखल रूग्णांची एकूण संख्या २० आहे. यामध्ये तायडे हॉस्पिटलमध्ये आमखेड येथील वंदना प्रदीप वाघ (४०), कमलबाई गजानन वाघ (५५), अंबादास भिमराव वाघ (४५), गोद्री येथील पांडूरंग विठ्ठल भवर (७०), सुमनबाई भवर (६५), पद्माबाई भवर (४०) व गायत्री भवर (२१) या सात रूग्णांवर उपचार सुरू आहे. डॉ.मिसाळ यांच्या दवाखान्यात साकेगाव येथील एकाच कुटूंबातील प्रदुम्न जगताप, नारायण जगताप व गीता जगताप यांच्यावर उपचार सुरू आहे.

चिंचोले हॉस्पीटलमध्ये शेषराव शेळके व कुशिवर्ता शेळके (रा.कोळगाव), विजय सुरडकर, अनिता सुरडकर, ओम सुरडकर (रा.शिंदी हराळी), व शीतल सोळंकी (रा.भालगाव) हे उपचार घेत आहेत. जयस्वाल हॉस्पिटलमध्ये भागूबाई जनार्दन सावळे (रा.वरुड) व उमाबाई वसंतराव ढोणे, वसंतराव संपतराव ढोणे (रा.पेठ) दाखल झाले आहेत. पानगोळे हॉस्पिटलमध्येही काही रूग्ण दाखल असल्याची माहिती आहे. विषबाधा झाल्यानंतर उपचारार्थ दाखल रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ.सुहास तायडे यांनी दिली.

रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व रूग्णांना भगर खाल्याने उलटी, डोकेदुखी, चक्कर येणे, थरकाप आदी एकसारखी लक्षणे आहेत. उपचाराअंती सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्यासारखे काही नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणा