शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
4
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
7
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
8
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
9
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
10
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
11
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
12
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
13
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
14
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
15
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
16
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
17
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
18
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
19
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
20
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात २६ टँकरला  मिळाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 18:19 IST

बुलडाणा: जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे. गेल्या आठवडाभरामध्ये जिल्ह्यात २६ टँकरला मान्यता देण्यात आली आहे;

बुलडाणा: जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे. गेल्या आठवडाभरामध्ये जिल्ह्यात २६ टँकरला मान्यता देण्यात आली आहे; तरीसुद्धा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरची प्रतीक्षा कायम आहे. गतवर्षी पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी झाल्याने हिवाळ्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरूवात झाली होती. सध्या जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढली असून त्यासाठी टँकर सुरू करणे, विहिर अधिग्रहण करणे याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच धांदल उडत आहे. दरम्यान, ९ एप्रिल रोजी  जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ११ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याध्ये     खामगाव राजा तालुक्यातील पारखेड, आवार, लोणी गुरव, शेलोडी, खुटपुरी, बोरजवळा याठिकाणी टँकर सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तर नांदुरा  तालुक्यातील  जवळा बाजार, शेगांव तालुक्यातील लासुर खु., लासुरा बु., सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी खुर्द,  दरेगांव येथे टँकरला मान्यता देण्यात आली आहे. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या आठवडाभरामध्ये २६ टँकर   टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी दिले आहे. 

 विहिर अधिग्रहणावरही भर जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थितीत पिण्याच्या स्त्रोतापासुन आवश्यक पाणी दरडोई दरदिवशी २० लिटर्स उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणुन टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील आठवड्यात नांदुरा तालुक्यातील सात, मलकापूर  व मोताळा तालुक्यातील गावांमध्ये टँकर सुरू करण्यात आले. तर विहिर अधिग्रहणावरही भर देण्यात येत आहे. 

टँकर सुरू करण्यासाठी पशुधनाचाही विचारटंचाईग्रस्त असलेल्या कुठल्याही गावात टँकर सुरू करण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या विचारात घेतली जाते. त्याचबरोबर गावातील पशुधनाचीही संख्या पाहून त्याठिकाणी किती लिटर्स पाणी पाठवायचे याला मान्यता दिली जात आहे. अडीच हजार लोकसंख्या  व एक हजार पर्यंत पशुधन असलेल्या गावांसाठी ६५ ते ७० हजार लिटर्स टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर करण्यात येत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई