शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

बुलडाणा जिल्ह्यात वर्षभरात ४२५ बालकांचा मृत्यू;आरोग्य विभाग सतर्क 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:44 IST

बुलडाणा : प्रभावी आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात यंत्रणा सतर्क असली तरी  वर्षभरात 0 ते ५ वर्षे वयोगटातील ४२५  बालकांचा मृत्यू  झाला आहे. यात ३७३ नवजा त अर्भकांचा समावेश असून, ८ स्तनदा मातांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाल व मा ता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला असून, ग्रामीण भागात  शासनाच्या विविध योजनेंतर्गत उपाययोजना सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्दे३२३ नवजात अर्भकांचा समावेश 

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रभावी आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात यंत्रणा सतर्क असली तरी  वर्षभरात 0 ते ५ वर्षे वयोगटातील ४२५  बालकांचा मृत्यू  झाला आहे. यात ३७३ नवजा त अर्भकांचा समावेश असून, ८ स्तनदा मातांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाल व मा ता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला असून, ग्रामीण भागात  शासनाच्या विविध योजनेंतर्गत उपाययोजना सुरू केल्या आहेत.शहरासह ग्रामीण भागात आजही कुपोषण, विविध आजार, अज्ञान, जुन्या परंपरेमुळे  आधुनिक उपचार घेण्यासाठी अनेक महिला पुढे येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे  अनेक विवाहित महिला गरोदर राहण्याच्या काळापासून काळजी घेताना दिसून येत नाही त. त्यामुळे उपजत, नवजात अर्भक तसेच 0 ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे मृत्यूचे  प्रमाण जास्त आहे. या अवस्थेमुळे अनेक वेळा मातांचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या  आहेत. बुलडाणा जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर २0१७ दरम्यान 0 ते ५ वर्षे वयोगटातील ४२५  बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 0 ते १ वर्षाखालील ३७३ नवजात अर्भकांचा  समावेश आहे. तसेच ८ स्तनदा मातांचा मृत्यू झाला आहे. सदर माता व बालमृत्यू  रोखण्यासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून  आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क  झाली असून, शहरी भागासह ग्रामीण भागात या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येत  आहे. बालमृत्यूंची संख्या पाहता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागात मोठी काळजी  घेणे या स्थितीत क्रमप्राप्त ठरत आहे.

कुपोषणामुळे १६८ उपजत मृत्यूजिल्ह्यात विविध कारणांमुळे बालमृत्यू झाले असले तरी मुख्य कुपोषणामुळे १६८ उपज त मृत्यू झाले आहेत. कुपोषणामुळे आईच्या पोटात असलेल्या बाळाचे पोषण होत नाही.  त्यामुळे अशा बाळाचा जन्म होण्यापूर्वीच मृत्यू होत असते. अशा प्रकारे १६८ उपजत मृ त्यू झाले आहेत. त्यात बुलडाणा तालुक्यात १८, चिखली २१, देऊळगाव राजा १३,  सिंदखेड राजा १, लोणार १२, मेहकर २0, खामगाव २0, शेगाव १२, संग्रामपूर १0,  जळगाव जामोद १0, नांदुरा ८, मलकापूर ९ व मोताळा तालुक्यातील १४ उपजत मृत्यूचा  समावेश आहे.

आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणार्‍या योजनाजिल्ह्यातील माता व बाल मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य  अभियान अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यात एका वर्षापर्यंत गरोदर मा तांची काळजी घेण्यासाठी जननी सुरक्षा योजना, मातेसाठी घर ते हॉस्पिटल येणे, जाणे,  औषध तसेच सोनोग्राफीसह विविध तपासण्यांसाठी जननी शिशू सुरक्षा योजना, संपूर्ण  गरोदर काळात ५ हजारापर्यंत अनुदान देणारी प्रधानमंत्री मातृवंदन योजना, गरोदर काळात  दर महिन्याला ९ तारखेला तज्ज्ञामार्फत मोफत तपासणीसाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व  अभियान, जिल्ह्यातील ७ तालुक्यांसह २७ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गरोदरमाता, स् तनदामाता तसेच बालकांची मोफत तपासणी व उपचारासाठी मानव विकास मिशन तसेच  नियमित लसीकरण मोहीम कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील माता व बालमृत्यू प्रमाण दरवर्षी कमी होत आहे. माता व बाल मृत्यू  रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या सर्वच यंत्रणा तत्पर असून, येणार्‍या काळात  शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळाल्यामुळे माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी  होण्यास मदत होणार आहे.-डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा 

टॅग्स :new born babyनवजात अर्भकDeathमृत्यूbuldhanaबुलडाणा