शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
2
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
3
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
4
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
5
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
6
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
7
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
9
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
10
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
11
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
12
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
13
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
14
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
15
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
17
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
19
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
20
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान

६३ हजार हेक्टरवरील पिके बाधित!

By admin | Published: October 13, 2016 2:16 AM

परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश.

खामगाव, दि. १२- सतत तीन वर्षापासून अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणार्‍या बळीराजाला यावर्षी परतीच्या पावसाने फटका दिला आहे. परतीच्या पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ६३ हजार हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाल्याची माहिती असून प्रशासनाने पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. गत तीन वर्षांमध्ये खरीपातील पेरणीसाठी मृगनक्षत्रात पेरणी योग्य पाऊस न झाल्याने अनेक शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली होती. गत वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतवृष्टीमुळे मुग, उडीद, सोयाबीन आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यासह जाणकारांनी व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी मृग नक्षत्रामध्येच खरीपाची पेरणी केली. सुरुवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने २0 दिवसाची उघडीप दिली. त्यामुळे मुग, उडीद आणि सोयाबिन या तिन पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सोयाबिन काढणीच्या हंगामातच परतीचा पाऊस बरसल्याने सोयाबिन पिकाचे नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या सोयाबिनला कोंब फुटले असून मातीमिश्रीत सोयाबिनच शेतकर्‍यांच्या पदरी पडत आहे. महसूल विभागाने नुकसानाची माहिती घेतली असता जिल्ह्यातील ५१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, तर १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये मुग, उडीद, सोयाबिन आणि तिळ या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यानुसार आता नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्रिसदस्यीय समिती करणार पंचनामे-पिकांच्या नुकसानाचे पंचनामे त्रिसदस्यीय समितीकडून करण्यात येणार आहे. कृषीसेवक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडून पीक नुकसानाचे पंचनामे केले जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी शासनाला हि माहिती पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या माहितीच्या आधारे विमा कंपनी देखील शेतकर्‍यांना नुकसानीचा लाभ देणार आहे. नुकसानाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता-महसूल, कृषी आणि ग्रामविकास या तीन विभागाच्या कर्मचार्‍यांकडून पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पाहणी नंतर जिल्ह्यातील नुकसानाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून, प्रशासनाने सर्वेक्षणाचे काम तातडीने करावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.