शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

साखरखेर्डा येथील जिल्हा को-ऑप बँकेचे ६७५ कर्जदार अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:56 IST

सिंदखेडराजा: तालुक्यातील साखरखेर्डा येथील जिल्हा को-ऑप बँकेच्या अधिकार्‍यांनी कर्ज वसुलीच्या नावाखाली ६७५ शेतकर्‍यांचे नव्याने पुनर्गठन करून त्यांना नवीन कर्ज वाटप केले आहे. ते सर्व कर्जदार कर्जमाफीत बसतात की त्यांच्या नावे ते कर्ज कायम राहते, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, ६७५ कर्जदार अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्देकर्जाचे पुनर्गठन करणारे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तालुक्यातील साखरखेर्डा येथील जिल्हा को-ऑप बँकेच्या अधिकार्‍यांनी कर्ज वसुलीच्या नावाखाली ६७५ शेतकर्‍यांचे नव्याने पुनर्गठन करून त्यांना नवीन कर्ज वाटप केले आहे. ते सर्व कर्जदार कर्जमाफीत बसतात की त्यांच्या नावे ते कर्ज कायम राहते, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, ६७५ कर्जदार अडचणीत सापडले आहेत.जिल्हा को ऑप बँक अवसायनात गेल्यानंतर थकीत कर्जदार शेतकर्‍यांकडून मोठय़ा प्रमाणात कर्ज वसुलीचा सपाटा लावला होता. साखरखेर्डा येथे कर्ज वसुली अधिकारी आणि सोसायटीचे सचिव यांनी सवडद, मोहाडी, शिंदी, राताळी, गुंज, वरोडी, गोरेगाव आणि उमनगाव येथील शेतकर्‍यांसोबत संपर्क साधून बँक वाचवायची असेल तर तुमचे कर्ज नवे-जुने करणे आवश्यक आहे. यासाठी सातबारा, स्टँप पेपर आणि अर्ज स्वत: भरून बँकेचे कर्ज वसुली अधिकारी शंकरराव जाधव यांनी ६७५ शेतकर्‍यांनी कर्ज भरल्याचे दाखवून त्यांना निलचा दाखला दिला आणि नवीन कर्जही वाटप केले. त्यामुळे ते शेतकरी थकीत कर्जाच्या यादीतून बाद झाले. ज्या १0४ शेतकर्‍यांनी कर्जाचे पुनर्गठन केले नव्हते ते सर्व कर्जदार आज कर्जमाफीत बसले आहेत; परंतु ६७५ शेतकरी या कर्जमाफीत बसले नाहीत, असा आरोप जिल्हा शिवसेना उपप्रमुख बाबुराव मोरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे शंकरराव जाधव आणि संजय पंचाळ या दोघांनी हा खटाटोप बँकेला सहकार्य करण्याच्या भूमिकेतून केला असला तरी या प्रकरणात सामान्य शेतकरी गोवल्या गेला आहे. या सर्व शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्जही भरले होते; परंतु त्यातील एकाही शेतकर्‍याला कर्जमाफीचा मॅसेज आला नाही. त्यामुळे आपण कर्जमाफीत बसतो की नाही, हा प्रश्न या शेतकर्‍यांना निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्जदार शेतकरी सध्या बँकेत वारंवार चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.

शेतकर्‍यांनी स्वत:हून कर्जाचे पुनर्गठन केले असून, आम्ही जबरदस्ती केली नाही. थकीत कर्जदार कर्जमाफीत बसले आहेत. नव्याने कर्ज ज्यांनी घेतले या बाबत काहीही सांगू शकत नाही. हा निर्णय बँकेचा आहे.- संजय पंचाळ, सचिव, ग्रामसेवा सहकारी सोसायटी

साखरखेर्डा येथील जिल्हा को-ऑप बँकेचे शाखा निरीक्षक, कर्ज वसुली अधिकारी आणि ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे सचिव यांनी शेतकर्‍यांच्या घरी जाऊन काही शेतकर्‍यांच्या सह्या घेतल्या. तर काही शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता त्यांचे कर्ज परस्पर निल करून नव्याने कर्ज वाटप केल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. आज ते सर्व ६७५ कर्जदार कर्जमाफीत बसले नाहीत. ही बँकेने सरळसरळ त्यांची फसवणूक केली आहे.- बाबुराव मोरे,शेतकरी तथा जिल्हा शिवसेना उपप्रमुख.

टॅग्स :sindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडाbuldhanaबुलडाणाbankबँक