शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

हनुमान सागर धरणाचे सर्व सहा दरवाजे उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 12:04 AM

Hanuman Sagar Dam : अमरावती, अकोला, बुलडाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी ४७ मी मी पावसाची नोंद झाली. 

- अझहर अली

संग्रामपूर (बुलडाणा) - गेल्या दोन दिवसापासून सूरू असलेल्या संततधार पावसाचा जोर कायम आहे. हनुमान सागर धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने सोमवारी सायंकाळी धरणाचे चार दरवाजे ५० से.मी ने उघडण्यात आले होते. रात्री सव्वा दहा वाजता उर्वरित दोन दरवाजे २५ से.मी. ने उघडण्यात आले आहे. त्यामुळे वान नदी पात्रात ६४.८५ घ मी/से विसर्ग वाढवून १२८.३० घ मी. से करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी ४७ मी मी पावसाची नोंद झाली. 

सोमवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या जलाशय पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या स्थिती धरणात ६५ टक्क्यांच्या वर जलसाठा उपलब्ध झाला असून पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सूरू आहे. वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुची नुसार प्रकल्पामध्ये जुलै अखेरीस ६१.४४ टक्के जलसाठा असणे आवश्यक आहे. त्या पृष्ठभूमीवर धरणातून वान नदी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात आजतागायत एकूण ४२५ मी मी पावसाची नोंद झाली आहे. 

सध्या स्थिती धरणाची जलाशय पातळी समुद्रसपाटीपासून ४०४.९० मीटर आहे. पाण्याची आवक प्रचंड वाढत असल्याने धरणाचे सर्व सहा दरवाजे उघडण्यात आले. चार दरवाजे ५० से.मी ने तर उर्वरित दोन दरवाजे २५ से.मी. ने उघडण्यात आल्याने धरणातून वान नदीपात्रात १२८.३० घ मी. से पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वान नदीला प्रचंड पूर आला आहे. विसर्ग वाढविणे अथवा कमी करण्याबाबतचा निर्णय पाण्याच्या आवक वर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे वान नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जल वीज निर्मिती संच सुरू होण्याची दाट शक्यता.हनुमान सागर धरणावरील वीज निर्मिती संच दोन ते तीन दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. गत सोळा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या वीज निर्मिती संचाची क्षमता १ हजार ५०० किलो वॅट असून यावर १ हजार किलो वॅट वीज निर्मिती करण्यात येते. या संचाची क्षमता दररोज ३६ हजार युनिट आहे. यामधून दररोज २० ते २५ हजार युनिट जनरेट होतात. धरणाच्या पाणी पातळीप्रमाणे वीज निर्मिती करण्याचे काम सुरू होते. सद्यस्थिती धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने जलाशय पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसात हनुमान सागर धरणावरील जल वीज निर्मिती संचावरून १ हजार किलो वॅट वीज तयार होण्याची दाट शक्यता आहे. येथील वीज निर्मिती संचावरून अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील उपकेंद्राला वीज पुरवठा करण्यात येतो.

टॅग्स :buldhanaबुलडाणा