शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

मेहकर तालुक्यात शेततळ्यांमुळे १२ कोटी लीटर पाण्याची उपलब्धता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : ‘मागेल त्याला शेततळे’, ही योजना मेहकर तालुक्यात शेतकर्‍यांसाठी संरक्षित शेती सिंचनासाठी उपयुक्त ठरत आहे. मेहकर तालुक्यात तब्बल १४0 शेततळे पूर्ण झाले असून, जवळपास १२ कोटी २६ लाख लीटर पाणी  उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा कल या योजनेकडे वाढला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी ...

ठळक मुद्देसंरक्षित शेती सिंचनासाठी सोयशेततळी आणि शाश्‍वत सिंचन

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : ‘मागेल त्याला शेततळे’, ही योजना मेहकर तालुक्यात शेतकर्‍यांसाठी संरक्षित शेती सिंचनासाठी उपयुक्त ठरत आहे. मेहकर तालुक्यात तब्बल १४0 शेततळे पूर्ण झाले असून, जवळपास १२ कोटी २६ लाख लीटर पाणी  उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा कल या योजनेकडे वाढला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्‍चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकावर, तसेच त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्‍वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शेतकर्‍यांसाठी  ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यापूर्वी झालेला शेततळय़ांच्या कामामुळे शेतकर्‍यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडित कालावधीत फायदा झाला असून, उत्पादनात काही प्रमाणात शाश्‍वतता आली आहे. आतापर्यंत मेहकर तालुक्यातील १४0 शेततळय़ांचे काम पूर्ण झालेले आहे. या शेततळय़ांच्या माध्यमातून पावसाचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी जमिनीतच जिरविण्यात आल्याने परिसरातील विहीर व बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाळय़ाच्या दिवसांत हेच शेततळे किमान तीन वेळा पावसाच्या पाण्याने भरल्या जात असल्याने कमी-अधिक छत्तीस कोटी लीटर पाण्याची उपलब्धी होत आहे. यापैकी काही भागात पाणी जिरते, तर उर्वरित पाणी पावसाच्या खंडित कालावधीत शेती सिंचनासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा फायदा झाला आहे.

विहिराला रब्बी हंगामात पाणी कमी असते. या शेततळ्याचा फायदा झाला असून, रब्बी हंगामात तूर आणि हरभरा पिकाला संरक्षित सिंचनाचा फायदा यामुळे मिळाला.-अविनाश अर्जुन दुतोंडे, शेतकरी, उसरण.

शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. शेततळे ही योजना शेतकर्‍यांसाठी संजीवनी देणारी योजना ठरली आहे.- गणेश गिरी, उपविभागीय कृषी अधिकारी, मेहकर.

टॅग्स :buldhanaबुलडाणा