शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लिहित्या, वाचत्या, विचारकर्त्या व्हा : नीरजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 16:01 IST

राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ‘‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, तर आपल्या जगण्याचा विचार, आत्मभान जगवण्याचा मार्ग, स्वत: ची स्वप्नं मनापासून जगण्याचा मार्ग आहे. स्वातंत्र्य म्हणजे आपल्यातील व्यक्ती शोधणे, स्वत्व शोधणे आहे. ते शोधा आणि लिहित्या, वाचत्या विचारकर्त्या व्हा’’, असे आवाहन मुंबई येथील कवयित्री, लेखिका नीरजा यांनी केले.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि प्रगती सार्वजनिक वाचनालय बुलडाणा यांच्या पुढाकाराने २५ आॅगस्ट रोजी आयोजित राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. शहरातील गर्दे वाचनालय सभागृहातील ताराबाई शिंदे साहित्यनगरीत संमेलनाचा एकदिवशीय दिमाखदार सोहळा विविध सत्रांमध्ये पार पडला. यावेळी नीरजा यांनी ५० मिनीटांच्या भाषणात विविध विषयांना हात घातल व्यवस्थेने आपल्यावर सोपविलेल्या चुकीच्या परंपरा फोडून त्यातून बाहेर पडा व पुरुषी व्यवस्थेत आपल्या जगण्याला अर्थ द्या, असे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले.यावेळी स्वागताध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या प्रभाताई चिंचोले, नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद, अहमदनगर येथील दिशा पिंकी शेख, मुंबई येथील ज्योती आंबेकर आदींसह साहित्यिक, साहित्यप्रेमी रसिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ग्रंथदिंडी व उद्घाटनासह विविध सहा सत्रांमध्ये हा सोहळा पार पडला. बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळसह राज्यातील अनेक भागातून महिला लेखिका, कवयित्रींचा मेळा या संमेलनासाठी जमला होता. संमेलनाचे संयोजन नरेंद्र लांजेवार व कार्यकारिणीच्या सदस्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. संमेलनाचे उद्घाटन ही लक्षवेधी ठरले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक