शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पूर पीडितांच्या मदतीसाठी सरसावली भाजपा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:34 IST

चिखली : रायगड, रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी जीव गमावला आहे. पूरपरिस्थितीत ...

चिखली : रायगड, रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी जीव गमावला आहे. पूरपरिस्थितीत अडकलेले हजारो लोक, मृत्यूच्या दाढेत प्राण कंठात घेऊन जगत असलेले आबालवृद्ध, डोळ्यांदेखत पुराने हिरावलेला संसार अशी विदारक स्थिती असल्याने पीडितांच्या मदतीसाठी हजारो मदतीचे हात पुढे आले आहेत. परंतु, अद्यापही काही भागात नागरिकांना मदत पोहोचली नाही म्हणून भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चिखलीच्यावतीने मदत उभारण्यात येत असून यामध्ये सर्वांनी शक्य तितके योगदान द्यावे, असे भावनिक आवाहन करण्यात आले आहे.

पुरामुळे उद्भवलेल्या विदारक स्थितीतून सावरण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, दानशूर आदी सर्वच क्षेत्रातून मदत केली जात आहे. असे असले तरी अद्यापही अनेक भागात नागरिकांना मदत पोहोचली नाही म्हणून भारतीय जनता पार्टी चिखली आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चिखलीच्यावतीने आमदार श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी, चिपळूणपर्यंत मदतीचे पार्सल पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने विविध समाजमाध्यमे व पॉम्प्लेटद्वारे सर्वांनाच मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

‘मदतीचा हात देऊया.. चला त्यांना पुन्हा उभं करू या !’

वस्त्रे, जीवनावश्यक वस्तू, अंथरूण, पांघरूण देण्यासाठी समाजाकडे मदतीची हाक दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने चटई, चादर, पॅन्ट-शर्ट, महिला व लहान मुलांसाठीचे कपडे, अन्न, धान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान येत्या ६ ऑगस्टपर्यंत ही मदत गोळा केल्यानंतर ती पूरपीडितांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दानशूरांकडून संपर्क साधावा. जेणेकरून त्यांच्याकडून मिळणारी मदत, सामग्री आम्ही स्वत: आपल्याकडे येऊन जमा करून घेऊ, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, नगरसेवक अनुप महाजन, नामू गुरुदासानी, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी केले आहे़

मदत देण्यासाठी यांच्याशी साधा संपर्क

मदत देण्यासाठी युवराज भुसारी, चेतन देशमुख, शार्दूल व्यवहारे, शंकर उदरकर, चैतन्य जोशी, शंकर देशमाने, आयुष्य कोठारी, यश भाला, पीयूष भीमेवाल, संदीप लोखंडे, अनिकेत सावजी, दत्ता खंडेलवाल, ऋषभ शर्मा, पीयूष अग्रवाल, अक्षय धुमाळ, विक्रांत महाजन, सचिन कोकाटे, मयूर गीते खंडाळा, कपिल झगडे, शुभम राजपूत, विजय वाळेकर, आकाश चुनवाले, अक्षय भालेराव, कैलास सपकाळ, नरेंद्र मोरवाल, यश टिपारे, शे.साबीर बाबू, हेमंत शिंगणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.