शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

भाजपला हवा बुलडाणा मतदारसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 13:33 IST

पक्ष निरीक्षक खा. अमर साबळे हे एक सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील इच्छूकांशी व्यक्तीगतस्तरावर चर्चा करणार आहेत.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एकीकडे महाजनादेश आणि जनआशिर्वाद यात्रांचा राज्यात बोलबाला सुरू असतानाच भाजपने स्वबळावर १४ व्या विधानसभेची निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू केल्याचेचित्र आहे. त्यानुषंगाने भाजपेच पक्ष निरीक्षक खा. अमर साबळे हे एक सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील इच्छूकांशी व्यक्तीगतस्तरावर चर्चा करणार आहेत. युतीसाठीच्या समांतर चर्चेसोबतच ही स्वबळाची चाचपणी असल्याचे पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असून युती झाल्यास भाजप शिवसेनेच्या वाट्याचा बुलडाणा विधानसभा मतदार संघ आपल्याकडे खेचण्याच्या तयारीला लागला आहे. परिणामी बुलडाणा भाजप-शिवसेनेचा जिल्ह्यातील ४-३ असा जुना फॉर्म्युला आता प्रसंगी ५-२ होण्याची साधार शक्यता व्यक्त होत आहे. पक्ष निरीक्षक खा. अमर सबाळे हे बुलडाण्यात दाखल होताच तातडीने जिल्ह्यातील सात ही विधानसभा क्षेत्रातील जिल्हा पदाधिकारी, इच्छूक उमेदवार, कोअर कमेटी, मंडळ अध्यक्ष आणि भाजपच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी भेटून चर्चा करणार आहेत. त्यामुळे त्यांचासमोर बुलडाणा विधानसभा मतदार संघ भाजपसाठी कसा महत्त्वाचा आहे. याचे तर्क मांडण्याची तयारी सुरू झाली आहे. एकीकडे भाजप-शिवसेनेचे वरच्या फळीतील नेत्यांमध्ये युतीचे ‘नक्की ठरल्याच’ सांगत असून त्यासाठी लोकसभेत उभय पक्षांची झालेली युती आणि मिळालेले यश याचा हवाला दिल्या जात आहे. जागा वाटपावरून होणारी शाब्दीक ‘फेकाफेक’ प्रत्यक्षात युती बाबत साशंकता निर्माण करत आहे. त्यातच बुलडाणा जिल्ह्यातही भाजपने आता जिल्ह्यातील सातही विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढण्यास इच्छूक असणाऱ्यांची पक्ष निरीक्षकामार्फत भेट घेऊन स्वबळाची तयारीच चालवली असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

बुलडाणा विधानसभेसाठी आग्रहजिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेला बुलडाणा विधानसभा मतदारसंघ भाजपला हवा आहे. त्यादृष्टीने भाजपकडून काही तर्कही दिल्या जात आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघ हा प्रारंभी भाजपकडे होता. मात्र १९९६ मध्ये शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री आनंदराव अडसूळ यांच्यासाठी आग्रहास्तव बुलडाणा लोकसभा शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता. त्यापूर्वी जनसंघाच्या काळापासून बुलडाणा लोकसभा मतदार संघ हा भाजपकडे होता. १९८९ मध्ये भाजकडून येथे सुखदेव नंदाजी काळे हे खासदार होते. १९९१ मध्ये पी. जी. गवई यांनी भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे मुळचा भाजपा असलेला लोकसभा मतदार संघ हा १९९६ मध्ये आग्रहाखातर शिवसेनेला सोडला होता. आता या बदल्यात बुलडाणा विधानसभा मतदार संघ हा भाजपला हवा आहे, असा तर्क भाजपच्या गोटातून दिला जात आहे. २०१४ मध्ये भाजपच्या उमेदवाराने येथे तब्बल ३३ हजार २३७ मते घेतली होती तर शिवसेनेचा उमेदवार हा बुलडाण्यात चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेला होता. सोबतच चिखली आणि सिंदखेड राजा येथेही भाजपच्या उमेदवाराला ४७ हजार ५२० आणि ४५ हजार ३४९ अशी दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. या पृष्ठभूमीवर जागा वाटपाचा दावा केला जात आहे.

भाजपचे पक्ष निरीक्षक खा. अमर साबळे हे एक सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील इच्छूकांशी चर्चा करणार आहे. बुलडाणा लोकसभेच्या जागेच्या बदल्यात बुलडाणा विधानसभा मतदार संघ भाजपला मिळावा, यासाठी प्रयत्नरत आहोत. जिल्हा परिषदेसह, पाच पंचायत समित्या, सहा पालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद पूर्वीपासून अधिक राहली आहे.-धृपदराव सावळे,जिल्हाध्यक्ष भाजप

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाbuldhanaबुलडाणा